वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पशुपक्ष्यांशी सोयरिक जोडणारे हे संतकवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात देहूच्या डोंगरावर जात असत. तेव्हा ते त्या डोंगरावरील झाडांशी व पशुपक्ष्यांशी एवढा तादात्म्य पावत की ते वृक्षवेली पशुपक्षी हे बंधू सखा भगिनी, माता पिता सखी वाटत असत. त्यांच्याशी ते मग आपल्या मनातील सुखदु:ख व्यक्त करीत असत आणि मग निसर्गाच्या सहवासात त्यांना एकांतवासात जे परमसुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत असत. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन त्यांना साथ देत असत, त्यात ते इतके तल्लीन होत की सारी संसाराची दु:खे विसरत असे.
वृक्षवल्ली हे आपलेच, कुटुंबीय आहेत असे मानणारे तुकारामासारखे इतरही संतकवी आपल्याला संत साहित्यात भेटतात. संत सावता माळी तर शेतात आलेल्या फळभाज्यांना आपले दैवत मानीत.
‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणून निसर्गावर प्रेम करीतच त्यांनी आपला भक्तीचा मळा फुलविला होता. तर बाह्यरंगापेक्षा अंतरंग पाहा हे सांगणा-या चोखोबांनी :
‘ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा
काय भुललासि वरलिया रंगा’’ हे सांगून भक्ती रसात उसाचा गोडवा आणला. तव वृक्षवल्लींची उपमा देताना ‘‘मराठीचि वेलू गेला गगनावरी’ सांगताना त्यांनी निसर्गाशी नेहमीच जवळीक केली आहे. रामदासांचं तर इतकं बारीक निरीक्षण होतं की त्यांनी दासबोधामध्ये औषधी झाडांची यादीच दिली आहे. पशुपक्ष्यांसंबंधीचा संदर्भ देताना मुंगी उडाली आकाशी
काय भुललासि वरलिया रंगा’’ हे सांगून भक्ती रसात उसाचा गोडवा आणला. तव वृक्षवल्लींची उपमा देताना ‘‘मराठीचि वेलू गेला गगनावरी’ सांगताना त्यांनी निसर्गाशी नेहमीच जवळीक केली आहे. रामदासांचं तर इतकं बारीक निरीक्षण होतं की त्यांनी दासबोधामध्ये औषधी झाडांची यादीच दिली आहे. पशुपक्ष्यांसंबंधीचा संदर्भ देताना मुंगी उडाली आकाशी
तिने गिळीले सूर्याशी’ हे आगळे आध्यात्म सांगितले आहे. तर आईच्या प्रेमाचा महिमा सांगताना ‘‘घार उडते आकाशी। चित्त तिचे पिलापाशी’’ असं उदाहरण दिले आहे. आधुनिक मराठीत ख-या अर्थाने निसर्गाशी समरस झालेले एकमेव कवी म्हणजे बालकवी. त्यांनी सारा निसर्गच आपल्या कवितेत आणला. ते नुसते उपमा देत बसले नाहीत, तर निसर्गाच्या भाषेतूनच ते बोलत असत. मराठीत अनेकांनी निसर्ग कविता लिहिल्या आहेत. पण निसर्गाशी ख-या अर्थाने फक्त बालकवीच समरस झाले. त्यावेळी पर्यावरणाचा दिवस साजरा होत नसे किंवा झाडे लावा ही मोहीमही नसे. पण गावी आपल्या शेतात काम करताना शेतकरी एक तरी झाड लावीत असे, बांधावर झाड लावणे हा त्यांच्या शेतीचाच एक भाग होता.
खरं तर आपणा सगळ्यांनाच निसर्गाची आवड आहे. परंतु आपण आळस करतो आणि आपण दूरच्या नातेवाइकांना जसे विसरतो तसे निसर्गालाही विसरतो. पर्यटनामुळे हल्ली आम्ही वनसहली काढू लागलो आहोत, परंतु तेथे निसर्गाशी जवळीक साधण्यापेक्षा फक्त मौजमजा केली जाते. त्यामुळे उलट निसर्गाला त्रास होऊ लागला असून जंगलात कचरा आणि बाटल्यांचा खच पडू लागला.. निसर्गापासून काही न शिकता आपण त्यापासून केवळ आनंदाची अपेक्षा करतो.
झाडाचे संवर्धन हे ३६५ दिवस करणे हे खरे पर्यावरण! खरे पर्यावरण म्हणजे शहरातून जंगलात जाणे नव्हे तर जंगलाला आपल्या शहरात आणणे हे महत्त्वाचे आहे. केवळ एक दिवस रोप लावणे म्हणजे पर्यावरण दिन संपत नाही. आपल्या घराच्या अंगणात किंवा परसात दरवर्षी एकतरी झाड लावणे आणि ते वाढविणे म्हणजे पर्यावरण आयुष्यात पाळणे, एक झाड तोडले तर दोन झाडे लावा हा नियम आपण पाळत नाही. लहानपणी आम्ही शाळेत १५ ऑगस्टला झाडे लावीत असू. ती चळवळ आता पर्यावरण दिनात पाळली जात आहे. आता शाळेत गेलो तर हे झाड आपण लावले हे अभिमानाने सांगू शकतो. नुसते झाड लावणे महत्त्वाचे नाही त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून कविवर्य ग. दि. माडगुळकर म्हणतात,
हाती नाही बळ
दारी नाही आड
त्याने फुलझाड
लावू नये।।
दारी नाही आड
त्याने फुलझाड
लावू नये।।