https://youtu.be/mFhCauntRic
जि. प.प्राथमिक शाळा #शेळका_धानोरा येथे #नवरात्री निमित्ताने #जागर_स्त्री_शक्तीचा कार्यक्रमांतर्गत महिलांच्या विविध स्पर्धा व मनोरंजक खेळ घेण्यात आले.
‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शनला नागीण (हर्पीस झोस्टर) असे म्हणतात, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्याही होतात. लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही.
पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ट नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्य भरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपीसारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता, अशा अनेक कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू पुन्हा जागृत होऊ शकतो. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.
● नागिणीच्या संसर्गाचे प्रकार :
१. हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार १ (HSV-1) २. हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार २ (HSV-2)
हे संसर्ग सुक्ष्मदर्शीतून एकसमान दिसतात आणि ह्यांचा तोंड व जननेंद्रियांच्या भागात संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारणतः (HSV-1) हा कमरेच्यावरच्या भागात उद्भवतो व (HSV-2) हा कमरेच्या खालील भागात उद्भवतो.
● गुप्तांगाजवळील नागीण :
गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो. सामान्यतः एखाद्या व्यक्तीला, गुप्तांगाचे एचएसव्ही–2 चे संक्रमण असलेल्या व्यक्तीकडून समागमाच्या दरम्यानच एचएसव्ही-2 चे संक्रमण होते. ज्या जोडीदाराला न दिसणारा फोड आहे आणि आपण संक्रमित आहोत किंवा नाही याची माहिती नसलेल्या जोडीदाराकडून संक्रमण होऊ शकते.
● गुप्तांगाच्या नागिणीची चिन्हे आणि लक्षणे :
‘व्हेरिसोला ऑस्टर’मुळे होणारी नागीण ही एकाच बाजूला होते व तिचा विळखा पडत नाही. परंतु ‘हर्पिस सिम्प्लेक्स’मुळे होणारी नागीण ही दोन्ही बाजूंना होते व पसरूही शकते. ही नागीण प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांत आढळून येते. प्रतिकारशक्ती कमी असल्याने ही नागीण पसरते व गंभीर स्वरूपात होऊ शकते. त्यामुळे ‘नागिणीचा विळखा पडल्यास गंभीर आजार आहे’ हा समज रूढ झाला असावा.
या नागिणीवरदेखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.
हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो. सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत. नागीण हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. जर डोळयात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.
● साधारण लक्षणे: १. सुरुवातील नागिणीच्या जागी फक्त वेदना किंवा आग होते. दोन-चार दिवसांत किंवा कधीकधी एका रात्रीतही भाजल्यावर येतात, तसे पाण्याचे बारीक बारीक फोड येतात. हे फोड एकत्र गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि एका विशिष्ट दिशेने वाढत जातात. २. नागिणीची प्रमुख तीन लक्षणे म्हणजे आग, वेदना किंवा खाज.
३. नागीण झाल्यावर तो भाग लालसर होतो, आतून दडदडीत होतो. अंगावर कपडे सहन होत नाहीत. त्या बाजूवर झोपताही येत नाही. जरासा धक्का लागला तरी डोळ्यांतून पाणी येते, संपूर्ण अंगाची आग होते, काही वेळा ताप येतो, झोप लागत नाही. काही दिवसांनंतर हे फोड मोठे होतात. शेजारचे छोटे छोटे फोड एकत्र होऊन मोठे फोड तयार होतात. नंतर ते फुटतात.
४. काही वेळा या फोडांमध्ये पूसुद्धा होतो. फुटल्यावर त्यातील पाणी निघून जाते आणि वरची त्वचा निघून जाऊन आतील मांस दिसू लागते. नंतर त्या मांसावर खपली येते, ती सुकून काळी पडते आणि आत नवीन त्वचा आल्यावर ती खपली गळून पडते.
● नागिणीच्या विशिष्ट लक्षणे :
– पाठदुखी. – नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटत राहते. – दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात – त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो. – त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो. – फ्लूमध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशीही लक्षणे यात असतात.
● हा आजार किती दिवसांपर्यंत असतो?
१. नागीण किती प्रमाणात झाली आहे, त्यावर त्याचा काळ अवलंबून असतो. पण साधारणतः नागिणीला चार आठवडे तरी लागतात. कांजिण्यांप्रमाणेच याचा बरा होण्याचा प्रवास असतो. फक्त त्या एका आठवड्यात कमी होतात, तर नागीण बरी व्हायला वेळ लागतो. नागीण आयुष्यात शक्यतो एकदाच होते.
२. एड्स किंवा जननेंद्रियांच्या सांसर्गिक रोगांमुळे होणारी नागीण मात्र वारंवार होऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास किंवा पथ्य न केल्यास नागीण बरी व्हायला खूप वेळ लागतो.
३. नागिणीबद्दल एक रूढ समज म्हणजे नागीण दोन्ही बाजूंनी आल्यास व विळखा पूर्ण झाल्यास तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार समजला जातो व त्यात रुग्ण दगावतो. यात कितपत तथ्य आहे? कुणी घरगुती उपचार करतात; मंत्र-तंत्रदेखील केले जातात. या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत.
४. वृद्धापकाळात झालेली नागीण बरी व्हायलाही खूप वेळ लागतो. अत्यंत वाईट बाब म्हणजे अशी नागीण बरी झाल्यानंतरही त्या जागेवरची आग किंवा वेदना या नंतर कितीही उपाय योजना केल्या तरी जन्मभर पाठ सोडत नाहीत.
५. काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.
६. साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.
● नागिणीसाठी प्रचलित उपचार आणि गैरसमज
१. तंत्र मंत्र ऊतारा हे सर्व अंधश्रद्धा आहेत. आजच्या कलियुगात आणि आधुनिक काळातही अगदी सुशिक्षित व्यक्तीही अनेक भ्रामक कथांना बळी पडत असतात. नागीण या रोगाबद्दलही अशाच अनेक भ्रामक कल्पना आहेत.
२. हा विकार कितीही भयंकर असला, तरी योग्य व वेळीच केलेल्या आयुर्वेदिक उपचारांनी तो निश्चितच पूर्ण बरा होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात ‘कक्षा’, ‘विसर्प’, ‘अग्निरोहिणी’ अशा नावांनी उल्लेख असलेल्या या विकाराला आपण नागीण, धावरे या नावांनी ओळखतो.
३. पूर्वी विषाणूंवर परिणामकारक औषधे नसल्यामुळे साधारणपणे अशा सर्व आजारांबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक भीती होती. आता नागिणीवर देखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.
● नागीण होण्याची कारणे
नागीण झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढवणाऱ्या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरण, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग नागीण होण्यास कारणीभूत असतात.
● हा आजार शरीरावर कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकतो?
डोक्यात, भुवईपासून कपाळावर, कानापासून मानेवर, छातीपासून पाठीवर, पोटापासून पाठीवर, खांद्यापासून हातावर किंवा कंबरेपासून पावलापर्यंत, स्त्री व पुरूषांच्या जननेंद्रियांवर हा आजार विळखा घालू घालण्याची जास्त शक्यता असते.
● आयुर्वेदिक उपचार :
नागिणीत वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते.
१. उंबाराच्या ४ पानांचा काढा करुन सकाळीच उपाशी पोटी घ्या.
२. गुळवेल सत्त्व १५मिली महामंजिंष्टादि काढा १५मिली हे दुपारी घ्या.
३. खदिरारिष्ट १५ml कायाकल्प वटी २ गोळ्या संशमनी वटी २ गोळ्या हे सायंकाळी घ्या.
४. ऊंबराची मुळी घासुन, दुर्वांचा रस करुन, कोरफडीचा गर हे मलम म्हणून बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात.
● पथ्य :
१. हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बरे वाटेपर्यंत पूर्ण बंद करणे आवश्यक आहे.
२. पोट साफ ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.
३. महत्त्वाचे म्हणजे आजाराच्या काळात सुरुवातीचे आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. नागीण काही प्रमाणात संसर्गजन्य आहे. नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना नागीण नाही, पण कांजिण्या मात्र येऊ शकतात.
मतदार यादीत नाव ऑनलाईन समाविष्ट करण्याची
लिंक
http://www.nvsp.in/Forms/Forms/Form6
मतदार यादीतील नावाची ऑनलाईन दुरुस्ती लिंक
http://www.nvsp.in/Forms/Forms/Form8
👉🏻किंवा👈🏻
👉🏻सर्व करिता आता Online Form भरण्याची प्रकिया खालीलप्रमाणे.
प्रथम www.ceo.maharashtra.gov.in वर जाऊन
Online Voter Registration वर Click करणे त्या नंतर
नमुना 6, 6A, 7, 8, 8A असे फॉर्म दिसतील.
👉🏻उदा. नमुना 6 वर गेल्यावर
State - Maharashtra
District - Palghar
AC - Vikramgad निवडा
👉🏻त्यानंतर Mandatory Detail मध्ये पुढीलप्रमाणे
प्रथम इंग्लिशमध्ये नाव टाकावे त्याचे आपोआपच प्रादेशिक भाषेत रूपांतर होते जर प्रादेशिक म्हणजेच मराठी भाषेत उदा.
👉🏻Name - Shrikrishan Vasudev
नाव - श्रीकृष्ण वासुदेव
👉🏻Surname - Yadav
आडनाव - यादव
⚡ (जर काना वेलांटी चूक असले तर आपल्या मोबाईलच्या keyboard च्या साहायाने आवश्यक तो बदल करता येतो)
👉🏻पुढे relative name
👉🏻RLT Name - Vasudev Shambhunath
नातलागचे नाव - वासुदेव शंभुनाथ
👉🏻RLT Surname - Yadav
नातलागचे आडनाव - यादव
👉🏻नंतर RTL Type - Father, Mother, Husband, Other प्रकार आहे.
तसेच वर दिलेल्या RLT मध्ये शक्यतो आईचे नाव टाकू नये जास्तीत जास्त वडिलांचे नाव टाका म्हणजे पुढे अडचण नको
👉🏻नंतर Date Of Birth
दोन प्रकारे जन्मतारीख टाकता येतात पण दुसरा प्रकारे सोईस्कर आहे.
👉🏻नंतर Gender निवडा
👉🏻नंतर Address
त्यात Current आणि Permnant पण दोन्ही सारखे असेल तर Current Add type केल्यावर
👉🏻Same Above वर Tik करा म्हणजे वरील पत्ता आपोआप खालीपन येतो
👉🏻नंतर 1) Photo Upload
2) Age proof Upload
3) Address proof Upload
।👉🏻नंतर Village Name
State Name
District Name
आणि
सदर गावातील वास्तवाचा कालावधी यात जन्मतारीख Copy Past करा
👉🏻Place :
👉🏻Date :
✔Submit
🌟महत्वाची सुचना - Photo व Document यांची size 100 KB पेक्षा कमी असावी.
🌟आवश्यक गोष्टी Cam saccaner
नावाचे App आणि Photo & Picture Resizer App
यांचा वापर करून नमुना 6 फॉर्म हा 5 मिनिटात मोबाईलवर भरता येते.
*आता विद्यार्थ्यांना दया 700 इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थासह सराव*
*तो ही Alphabetically*👇
https://www.youtube.com/playlist?list=PLxyKePnpoZbx2ViqNe_cWvGm-pANEVsh2
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
*Like, Share and Subscribe my Youtube channal and see my all educational videos*
https://youtube.com/c/GodavariTambekar
● *_पायाभूत चाचणीचे गुणनोंद तक्ते कसे बनवावीत?_*●
🚥🚥 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🚥🚥
═══════════════════
https://youtu.be/X9vbzc-f1NE ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*_🚸 २८-०८-२०१८ ते ३१-०८-२०१८ या कालावधीत घेतलेल्या पायाभूत चाचणीचे गुण आपणास सरल प्रणाली वरती अपलोड करावयाचे आहेत. आपल्या शाळेतील पटसंख्या जास्त असेल किंवा आपणास दुसऱ्या शाळेचे गुण भरावयाचे असतील अशा वेळी आपणास गुण नोंद तक्ते लागतात._* ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🚸 *_पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते विद्यार्थी नावासह कसे प्रींन्ट करावेत?_*
🚸 *_Excel Sheet च्या मदतीने Pdf गुणनोंद तक्ते कसे तयार कराल?_*
🚸 *_आपण दुसऱ्या शाळेचे गुण भरणार असाल तर काय कराल?_*
🚸 *_विद्यार्थी संख्या जास्त असेल तर पायाभूत चाचणी गुण भरण्याचे नियोजन कसे करावे?_*
🚸 *_पायाभूत चाचणी गुण होणाऱ्या चुका कशा कमी कराव्यात?_*
👉🏻 *_पायाभूत चाचणीचे गुण नोंदतक्ते संबंधी वरील गोष्टींची अतिशय सोप्या पध्दतीने दिलेली माहिती खालिल लिंकवर क्लिक करुन पाहू शकता._*
👉🏻 *_खालील लिंक youtube मध्ये open करुन व्हिडिओ पाहा._*
*_लिंक_* 👉🏻 https://youtu.be/X9vbzc-f1NE
═══════════════════
*व्हिडिओ आवडल्यास like व शेअर करायला विसरू नका channel subscribe करुन समोरील बेल वर क्लिक करुन असेच नवनवीन video नियमित मिळवा*
═════════════════
✍🏼 *शब्दांकन* ✍🏼
*श्री नितिन समुद्रे*
*📱 08156048686📱*
🚥 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🚥
═══════════════════
👉🏻 *आपल्या मिञांना तसेच आपल्या शैक्षणिक Group वर शेअर करा.*
चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही अत्यंत महत्वाच्या टिप्स --
१) पहिल्यांदा टांगलेल्या धुडाच्या मागच्या पायांच्यामध्ये एक नजर टाकून घ्यावी.
२)साधारण आकारावरून मगच ठरवावं की घ्यायचं का नाही.मध्यमवयीन बोकडाच मटन सर्वोत्कृष्ट असतं.
कोवळं लगेच शिजतं, राळ होतं, आणि हाडं खायला मजा येत नाही.
३) थोराड बोकडाचं मटन शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं नाही लागत.
४) मटन घेताना हाडं आणि मऊ समप्रमाणात घ्यावं. हाडांमुळं रश्याला चांगली चव येते.
मऊ मटन खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात.
आमच्याकडे हाडांच्यावर जास्त डोळा असतो त्यामुळे हे प्रमाण ७०:३० आहे.
५)सीन्याचा भाग सर्वात चांगला. यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं. त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळता येतात.
६)मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. नळीतला गुद्दु ओढून खाताना प्रचंड आनंद मिळतो.(Noal Harari च्या म्हणण्यानुसार हे आपलं आद्य खाद्य आहे.)
७) काळजाचा माफक तुकडा आठवणीनं घ्यावा.
८) चरबीसुद्धा थोडीशी घ्यावी, यामुळे सुक्क्या मटणाच्या चवीत दुपटीने वाढ होते.
चरबीच्या नावाखाली पडदा दिला जातो, तिथं २ मिनिट वाद घालण्याची तयारी ठेवावी.
९) जर्मनच्या पातेल्यात शिजवलेल्या मटणास सर्वोत्तम चव येते. कुकर सहसा वापरू नये, मटन बेचव होतं.
१०) घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती-भाकरी चुरून खाता येते.
चुरून खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे.
११)लिंबू फार पिळून खाऊ नये, कांदा सुद्धा अगदी २-३ घासात एकदाच खावा. कोशिंबीर असेल तर हात सैल सोडण्यास हरकत नाही.
१२) लहानग्यांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा.
मोठ्यांसाठी हाच रस्सा सूप म्हणून देता येऊ शकतो.
मांसाहार - एक आध्यात्मिक पुण्य 84 लक्ष पशु जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो असे सांगतात. पशूंपक्षांच्या जन्मात वर्षानुवर्षे वाया जाण्यापेक्षा, पशुपक्ष्यांना त्यातून मुक्त करून त्यांचा मनुष्ययोनीकडेचा प्रवास वेगवान करण्याचे पुण्यकर्म मांसाहारी लोक करत असतात.तेव्हा मांसाहाराला पाप समजण्याची चूक चुकूनही करू नका. मटण खा, पुण्य कमवा .
बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील,
🍁🍁🍁चहाचे दुष्परिणाम.🍁🍁🍁
🍁१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.
🍁 २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
🍁३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.
🍁४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
🍁५. टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
🍁६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.
🍁७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’
🍁८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
🍁९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
🍁१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.
खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही .
*दिवसातून एक तरी अशी पोस्ट टाका जेनेकरून ती पोस्ट सर्वांच्या उपयोगी पडेल* जनहितार्थ -
आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,मी एक खाली लिंक देत आहे,त्यावर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल,edc फॉर्म भरा,आपला हक्क बजावा ,
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://103.23.150.139/marathi/&ved=0ahUKEwil94Gkh_TRAhVIOI8KHVOiBxgQFggZMAA&usg=AFQjCNEkT7DB8COk02IaZlJEals-ESVx9w&sig2=f6NqSsB-elIYcTneQbJcgg
*सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो.येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधीकधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते.तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता. म्हणूनच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे . दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात*
*रक्तदान कोणी करावे व कसे?*
*रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.*
*1]त्याचप्रमाणे रक्तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे.*
*2]वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्क्यांपेक्षा जास्ते असावे.*
*3]हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.*
*4]रक्तदात्याने आधी किमान तीन महिने रक्तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टर सल्ला घ्यावा.*
*5]उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्तदान करु नये.*
*6]रक्तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्तदात्यास रक्तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.*