Tuesday, 26 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण वाढले.

दि.26 मे.2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन
कोरोना रुग्ण वाढले.

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील
 आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मामाबाद शहरातील
पापनाश नगर मधील एक, कळंब तालुक्यातील
 शिराढोण
 येथील
 एक आणि उस्मानाबाद तालुक्यातील तेर
मधील एक जण आहे. उस्मानाबाद मधील
रुग्ण मुंबई रिटर्न ,तेर मधील रुग्ण पुणे रिटर्न
 तर शिरढोण
 मधील रुग्ण कोरोना बाधित
कुटुंबातील  आहे.;  उस्मानाबाद जिल्ह्यात
आता कोरोना बाधित रुग्णाची  संख्या ३८
झाली आहे.

 जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक
 25 मे 2020 रोजी लातूर येथील
प्रयोगशाळेत  पाठवलेल्या अहवाला मधील
प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन
 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून
दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी
 माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर
राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे..

पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक
उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा
रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून
आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून
 तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे.
तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब 
तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या
 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे,
 असे डॉक्टर सतीश आदरतराव व जिल्हा
शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले
 आहे.
पैकी आठ जणांना डिस्चार्ज  देण्यात आला
आहे.विशेष म्हणजे डिस्चार्ज  देण्यात आलेल्या
 एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला
आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० रुग्णावर
उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यत
सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी
 रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत.  उमरगा - ८,
कळंब -८, परंडा -६, लोहारा- ५,
उस्मानाबाद - ५, वाशी -३, भूम - २,
तुळजापूर - १  अशी तालुकानिहाय संख्या आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची
संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण
पसरले आहे.

Monday, 25 May 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४३)

दि. २६ मे २०२०  वार- मंगळवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-४३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
 
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/virus-warrior-marathi

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

*Story weaver*
दम - ए - दम बिर्याणी
https://bit.ly/2zulzEB

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मिठाई
https://bit.ly/2ZAgntp

*चित्रकला*
संकल्प चित्र : पूर्वतयारी
https://bit.ly/2ZzRM8o

*Reading English*
Long words with sh/ch
https://bit.ly/2ATv6W5

*संगणक विज्ञान*
Scratch Animation Part 3
https://bit.ly/2Xk4Tre

*संगीत/नाटक*
गायन
राग - यमन
https://bit.ly/3ea1JgC

*मजेत शिकूया विज्ञान*
Game of Acid and Base
https://bit.ly/2ZBnLF0

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित
पाठ - अंतराचे सूत्र
https://bit.ly/2XpGGjA

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - मराठी (व्याकरण)
घटक - लिंग व त्याचे प्रकार
https://bit.ly/2Xk59qc

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - परिमेय संख्या व अपरिमेय संख्या
https://bit.ly/2XpGMHY

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

Sunday, 24 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ६ कोरोना बाधित

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ६ कोरोना बाधित


उस्मानाबाद
- उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची 
संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उस्मानाबाद 
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचि संख्या ६ ने वाढली आहे.
 आज उमरगा येथे ३ परंडा येथे १ तर जिल्हा शासकीय
 रुग्णालय उस्मानाबाद येथे २ रुग्णांचे अहवाल 
होकारात्मक आले  असल्याची माहिती जिल्हा
 शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
 आज जिल्ह्यात एकूण ४७ रुग्णांचे अहवाल आले आहेत.
 त्यातील ३५ जणांचे नकारात्मक तर ६ जणांचे संदिग्ध 
तर ६ जणांचे होकारात्मक आले आहेत. 

Saturday, 23 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण पाॅझिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 
  • कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला 
आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा 
कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला 
असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक 
डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात 
एकूण ४१ रुग्णांचे अहवाल आले. त्यातील दोघांचे
अहवाल होकारात्मक आले आहेत.तर ३४ जणांचे
 अहवाल नकारात्मक आहेत
 तर ४ जणांचे अहवाल
 प्रलंबित आहेत आणि चाचणीसाठी पाठवलेला एक नमुना रद्द
करण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने
रेड झोन मध्ये वाढ होत आहे.

Friday, 22 May 2020

उस्मानाबाद- शुक्रवारी दिवसभरात चार रुग्ण सापडले

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार कोरोना रुग्ण

शुक्रवारी दिवसभरात चार रुग्ण सापडले 
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. शुक्रवारी दुपारी वाशी तालुक्यातील पिंपळगावच्या पती-  पत्नीचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले होते, त्यानंतर रात्री उशिरा दोन जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात पाथर्डी (ता. कळंब) आणि कुकडगाव ( ता. परंडा) येथील रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील  10 व्यक्तींचे  अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल  अनिर्णित (Inconclusive) आले असून एका व्यक्तीचा अहवाल परिपूर्ण न आल्यामुळे  रद्द (reject)करण्यात  आला आहे.दोन पॉझिटिव्ह व्यक्तीपैकी एक कळंब तालुक्यातील पाथर्डी व दुसरी व्यक्ती परंडा तालुक्यातील कुकडगाव येथील आहे.विशेष म्हणजे आजच  पाथर्डी येथील दाम्पत्याने कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, पण याच गावात पुन्हा नवा रुग्ण सापडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  कोरोना रुग्णाची संख्या २८ झाली आहे. पैकी सहा जण बरे झाले असून, २२ जणांवर उपचार सुरु आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्णांची वाढ सुरूच

 उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सहाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात परंडा १, वाशी १, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असा समावेश आहे.

 गुरुवारी सकाळी शिराढोण  येथील एक महिला आढळून आली होती मात्र ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी १७ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले असून, पैकी चार  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्यस्थितीत १९ रुग्ण आहेत.
उस्मानाबादेतील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

उस्मानाबाद शहरात धारासूर मर्दिनी रोड भागातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती, दरम्यान या तरुणाच्या संपर्कातील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात एकूण 13 कोविड पॉझिटिव्ह  रुग्णावर उपचार 
 जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 982 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 220, लोहारा 76, कळंब 166, वाशी 18, भूम 41, परंडा 85 अशा व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 840 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 34 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 92 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.
 आज दि.21/05/2020 पर्यंत एकुण 17 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हात आढळुन आले त्यापैकि 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले (उमरगा 3 व परंडा 1 ) सदयस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 13 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैदयकिय महाविदयाल सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे  तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4,  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे 1 असे एकुण 13 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत सदया त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

Tuesday, 19 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्याची रेड झोनकडे वाटचाल


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णाच्या संख्येत एकदम  सहाने वाढ झाली असून एकूण संख्या १३ झाली आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे यापूर्वी सात रुग्ण होते. त्यात  19 मे रोजी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट मध्ये सहा जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. मुंबई पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत , या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारनटाईन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 जण, भूम तालुक्यातील गिरवलीचा 13 वर्षाचा एक मुलगा , उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण, तुळजापूरची 1 महिला यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  विशेष म्हणजे वरीलपैकी तुळजापूरची महिला पुण्यावरून आली असून इतर सगळेजण हे मुबंई वरून आलेले आहेत.उस्मानाबाद जिल्हयात आल्यानंतर वरील सर्व 6 जणांना क्वारंटाईन केले होते.


उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागात असलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली असून तो तरुण मुंबई येथून सोलापूर पर्यंत खासगी जीपने त्याच्या आईसह 5 जणसोबत आला व त्यानंतर सोलापूरहुन 20 किमी पायी चालत हे आई व मुलगा उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आले व नंतर त्याचा भाऊ त्यांना दुचाकीवर उस्मानाबाद शहरात घेऊन आला. या रुगणाला अगोदर पासूनच ब्लड कॅन्सर असून त्यात कोरोना ही बाब चिंताजनक आहे. या तरुणाच्या घरी 12 जण असून इतर 7 असे 19 जण हायरिस्क संपर्कात आहेत.

तुळजापूर शहरातील 21 वर्षीय महिला ही पुणे येथून आली असून ती 6 महिन्याची गरोदर माता आहे त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, भोसले गल्लीत राहणाऱ्या या महिलेच्या संपर्कात 12 जण आले आहेत. भूम येथील 13 वर्षीय मुलगा हा मुंबई येथून आला असून त्याची बहीण मुंबई येथे पॉझिटिव्ह सापडली असून आई नर्स आहे. हा मुलगा वडिलांसोबत गावी आला असून त्याला शाळेत ठेवण्यात आले होते, याच्या संपर्कात 2 जण आहेत अशी माहिती गलांडे यांनी दिली.
परंडा तालुक्यातील 2 रुग्ण हे भूम तालुक्यातील रुग्णाच्या सोबत प्रवास करून आले होते त्यांच्या संपर्कातील 7 जण हायरिस्क आहेत.लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्ण कांदिवली मुंबई येथून आला असून त्याच्या संपर्कात 6 जण आले आहेत. या सर्व 6 रुग्णावर उपचार करण्यात येणार असून संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. कळंब येथील महसूल विभागाच्या कर्मचारी असलेल्या रुग्णाला अगोदरच किडनीचा त्रास असल्याने त्याची स्तिथी चिंताजनक बनली आहे.

Monday, 18 May 2020

अकलुजचा किल्ला व शिवसृष्टी

⛳ 🏰   *गडवाट*   🏰 ⛳

🗡️ *अकलूजचा किल्ला* 🗡️

*"अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे.*

 किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत.

तिकीट काढून किल्ल्यात शिरताना प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची म्युरल्स्‌ पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स्‌ व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स्‌ मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्‍यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.

किल्ल्याच्या मधोमध असणार्‍या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूस शेकोटी पेटवून पहार्‍यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.

किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इ समावेश आहे. हे पुतळे पहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.

किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.
"

Friday, 15 May 2020

शाळा बंद.....शिक्षण चालू

दि. १६ मे २०२०  वार- शनिवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-३३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.
      आपण या अभ्यासमालेत *कोरोना योद्धा* ही एक  लिंक देत आहोत. या  लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे *कोरोना योद्धा* पुस्तक!
     त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही *प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका* ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व  5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.
   
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/coronavirus-warrior

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.
08033094243

*Storyweaver*
जादव आणि जंगलं
https://bit.ly/2Z4VxSN

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : गहू
https://bit.ly/2X4LtH4

*चित्रकला*
यथार्थदर्शन
https://bit.ly/3fPjlQB

*स्पोकन इंग्लिश*
English Speaking Practice
https://bit.ly/2Z1cGNk

*संगणक विज्ञान*
थीम बदलणे
https://bit.ly/2Ta4S87

*संगीत/नाटक*
गायन -वादन
केहरवा तालावर आधारित गीत
https://bit.ly/3dS47bT

*मजेत शिकूया विज्ञान*
Vibrating Brush
https://bit.ly/2WZpnp9

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - प्रकाशाचे अपवर्तन
https://bit.ly/3dR9ND1

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका
https://bit.ly/2y3T7J4

*इयत्ता - ८ वी*
प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका
 https://bit.ly/2Z7gi0o

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

Thursday, 14 May 2020

उस्मानाबाद -कळंब तालुक्यात तीन रूग्ण कोरोना पाॅजिटीव

उस्मानाबाद येथील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22  व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.  उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3  व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड  येथील 15 व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल(Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.  उस्मानाबाद येथील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.  असे एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51  व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले असून 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.     

Wednesday, 13 May 2020

IMMUNE SYSTEM शरिराची प्रतिकारशक्ती

*प्रतीकात्मक लेख*
(Dr in Army's view)

हमारा इम्यून सिस्टम क्या करता है वायरस को हराने के लिए ?

ज्यादातर लोग कोरोना वायरस से इन्फेक्ट होकर अपने आप ठीक हो जा रहे हैं। कैसे ? .

वास्तव में शरीर के अंदर एक बड़ा युद्ध होता है बाकायदा !
.


#वायरस_का_हमला :

वायरस आया शरीर में, 4 दिन गले में रहा, फिर लंग्स में उतर गया, लंग्स में एक सेल के अंदर घुसा और उसके रिप्रोडक्शन के तरीके को प्रयोग करके खुद के clone (copies) बना लिए, फिर सारे clones मिलकर अलग अलग सेल्स को अंदर घुसकर ख़त्म करना शुरू करते है। अब तक बहुत सारे वायरस हो जाते हैं फेफड़ों में । मौत के निकट पहुँचने लगता है इंसान। शुरू में वायरस फेफड़ों के epithelial सेल्स को इन्फेक्ट करता है।

वायरस अभी तक जंग जीत रहा होता है।
.

#शरीर_के_सेनापति_तक_खबर_पहुँचती_है :

हमारे शरीर का सेनापति होता है हमारा इम्यून सिस्टम,
इम्यून सिस्टम के पास सभी दुश्मनों का पुराना नया लेखा जोखा होता है कि किस पर कौनसा अटैक करना है, तुरंत एंटी-बॉडीज की एक सेना तैयार की जाती है और multi वायरस सेना पर हमले के लिए भेज दी जाती है।
.

#एंटी_बॉडी_सेना_की_रचना :

एंटीबाडी सेना की रचना अटैक के तरीके को देखकर होती है,
अगर वह वायरस पहले अटैक कर चुका होता है तो उसकी एंटीबाडी रचना पहले से मेमोरी में रहती है और उसे तुरत वायरस को मारने के लिए भेज दिया जाता है।
अगर वायरस नया है जैसा कि कोविद 19 के केस में है, तो इम्यून सिस्टम हिट एंड ट्रायल से सेना की रचना करता है।

सबसे पहले भेजा जाता है हमारे शरीर के सबसे फेमस योद्धा "इम्मुनोग्लोबिन g" को,
ये शरीर की सबसे कॉमन एंटीबाडी है और ज्यादातर युद्धों में जीत का सेहरा इसी को बंधता है।
इम्मुनोग्लोबिन g सेना शुरूआती अटैक करती है वायरस सेना पर और उसे काबू करने की कोशिश करती है।
इस सेना को एंटीबाडी इम्मुनोग्लोबिन m सेना Cover फायर देती है जो अटैक की दूसरी लाइन होती है।
.

#युद्ध_की_शुरुआत :

दोनों ही पार्टियों में,
भीषण युद्ध छिड़ता है । इम्मुनोग्लोबिन g वायरस पर बुरी तरह टूट पड़ता है और उसे बेअसर करने की कोशिश करता है,
Organ के जो सेल्स अभी तक ख़त्म नहीं हुए होते हैं उन्हें बचाने की कोशिश की जाती है ताकि वो सुसाइड ना कर ले,
लेकिन वायरस क्यूंकि अभी ताकतवॉर है इसलिए वो सेना की इम्यून सेल्स को भी इन्फेक्ट करना शुरू कर देता है, जो वायरस को अपनी जीत के तौर पर लगता है। लेकिन...
तभी आती है....

#इम्यून_सिस्टम_की_वानर_सेना :

इम्मुनोग्लोबिन g और इम्मुनोग्लोबिन m के अलावा हमारा इम्यून सिस्टम एक गुरिल्ला आर्मी भी छोड़ देता है खून में,
जिसमे तीन टाइप के प्रमुख योद्धा हैं,
पहले हैं B सेल्स, जो सामान्य सेना टाइप है, जैसे हर मिस्त्री के पास एक बंदा होता है जो सब कुछ जानता है ।
दुसरे हैं हेल्पर T सेल्स, जो मददगार सेल्स होते हैं, और बाकी सेल्स को हेल्प करते हैं,
तीसरे और सबसे इम्पोर्टेन्ट होते हैं किलर T सेल्स, जो शिवाजी की सेना की तरह चुस्त योद्धा होते हैं और आत्मघाती हमला टाइप करते हैं जिस से वायरस के छक्के छूट जाते हैं।
.

#युद्ध_का_लम्बा_खिंचना :

जितना युद्ध लम्बा खिंचता जाता है उतनी ही मात्रा में B और दोनों टाइप के T सेल्स की मात्रा खून में बढ़ती जाती है।
.

#ज़िन्दगी_और_मौत_का_फर्क :

*इंसानी मौत के ज्यादा चांस तब हैं जब उसका इम्युनिटी का सेनापति पहले से किसी और बीमारी से लड़ रहा हो,* जैसे कैंसर आदि।
ऐसे case में उसकी सेना को दो या ज्यादा fronts पर लड़ना होता है, और कहीं किसी front पर हार भी हो जाती है।

जब वायरस इम्यून सेल्स को इन्फेक्ट कर रहा होता है तो वह ट्रैप में फंसता रहता है, फिर इम्मुनोग्लोबिन g और इम्मुनोग्लोबिन m, खून से सप्लाई हो रही वानर सेना से मिल कर वायरस पार्टी को बुरी तरह ध्वस्त शुरू कर रही होती है,
इस लड़ाई ट्रैप वगैरह में कई दिन लग जाते हैं, इसलिए बीमार और वृद्ध व्यक्ति इतना अगर झेल गया तो बच जाता है वरना lungs बर्बाद हो जाते हैं और पहले से बीमार या वृद्ध व्यक्ति की मौत हो जाती है । लेकिन स्वस्थ इंसान में ऐसी संभावना कम होती है। वायरस की जीभ बाहर फिंकवा देता है हमारा इम्युनिटी सेनापति ।
इस युद्ध के दौरान इंसान को ज्यादा से ज्यादा आराम (Quarantine) करना होता है, ताकि सेनापति को युद्ध के अलावा बाकी चीज़ों की टेंशन ना लेनी पड़े।
.

#इम्युनिटी_सेनापति_की_जीत :

जीत के बाद जश्न होता है, इस समय आपके खून में बी और टी सेल्स भारी मात्रा में होते हैं और सारे इकट्ठे "जयकार" बोल देते हैं ।
जीत होते ही यह पूरा घटनाक्रम इम्यून सिस्टम की मेमोरी की History में दर्ज़ हो जाता है ।
कुछ वायरस जो ताकतवर होते हैं उनका record आगे के लिए हमेशा के लिए लिख लिया जाता है । जैसे कि चिकनपॉक्स और पोलियो वाले का । जब भी ये शरीर पर दुबारा हमला करे तो कैसे जल्दी से निपटाना है इसको, ताकि देर ना हो जाए !
कुछ वायरस फालतू टाइप्स भी होते हैं जैसे जुकाम वाले इंफ्लुएंजा टाइप्स । उनको इम्यून सिस्टम मेमोरी महीना दो महीना रख कर रद्दी में फेंक देती है, कि फिर आएगा तो देख लेंगे दम नहीं है इस बन्दे में। इसीलिए इंसान को जुकाम होता रहता है साल दर साल, फिर भी सेनापति कम ध्यान देता है, क्यूंकि यह सेनापति के हिसाब से हल्का वायरस है, कभी भी इसे बिना पूरी सेना लगाए आसानी से ख़त्म किया जा सकता है ।
अन्य सामान्य छोटे मोटे रोगों (चोट लगना, fever, cough आदि) में सेनापति के एंटीबॉडीज आवश्यकतानुसार कदम उठाते रहते हैं, लेकिन सभी प्रकार की सेना को एक साथ आदेश देने का काम Commander आपातकाल में ही करता है।

धन्यवाद
एक डॉक्टर की कलम से

Monday, 11 May 2020

ग्रीक झोन उस्मानाबाद मध्ये आढळला कोरोना पाॅजिटीव रूग्ण

गालबोट : उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ३७ दिवसानंतर कोरोना बाधित एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे ग्रीन झोनला गालबोट लागले आहे. हा रुग्ण परंडा येथे सापडला असून, तो पिकप टेम्पो चालक आहे. 


हा पिकप टेम्पो चालक ३० वर्षाचा असून तो मागील काही दिवसापासून  परंडा येथून पुणे तसेच नवी मुंबई येथे जात होता. तो  पिकप टेम्पो मधून टरबूज तसेच अन्य फळांची वाहतूक करीत होता. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. त्याला उपचारासाठी परंडा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

हा पिकप टेम्पो चालक आजपर्यंत कुणाकुणाच्या संपर्कात आला, याची शोध मोहीम सुरु झाली आहे. तसेच कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यामुळे परंडा शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा रविवार पर्यंत ग्रीन झोन मध्ये होता. मागील एक महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे नागिरकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी सर्व व्यवहार सुरु करण्यास शनिवारी परवानगी दिली. त्यानुसार आज सर्व व्यवहार सुरु झाले होते तसेच  एसटी बस सेवा देखील सुरु झाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी तीन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले होते, परंतु ते पूर्णपणे बरे झाले होते. त्यानंतर ३७ दिवसानंतर कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एंट्री केली आहे. त्यामुळे ग्रीन झोनला गालबोट लागले आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्फत 9 व्यक्तींच्या स्वाबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

Saturday, 25 April 2020

शकुनीची गोष्ट

*शकुनीची गोष्ट*


शकुनीचं वास्तव काय आहे?

गांधार देश व गांधारी याबद्दलची माहिती ही अत्यंत अल्प अशी माहिती आहे आपल्याला..महाभारत, कुरु व यदु कुल यांच्या प्रभावळीत गांधार देश हरवल्यासारखा आहे..

गांधार देश, गांधारी, शकुनी हा एक स्वतंत्र विषय होईल, एक मोठं पर्व, गांधार पर्व होईल एवढा इतिहास या गांधार देशाला महाभारतात आहे.परंतु, आपल्यापर्यंत केवळ गांधारी, तिचं अंध पतीला स्वीकारुन स्वतःचे नेत्र एका पट्टीनं बंद करणं व शकुनीचं कारस्थान एवढंच आलंय..

गांधार देश, आत्ताचा अफगाणिस्थान..राजा सुबल, यांना शकुनीसह एकूण शंभर पुत्र व गांधारीसह एकूण दहा कन्या होत्या..

गांधारी हे तिचं मूळ नाव नव्हे..गांधारीचं मूळ नाव शुभा हे होतं..जे गांधार देशावरुन नंतर गांधारी हे पडलं..शकुनीचं नाव सौबल..

शकुनि हा अत्यंत खलप्रवृत्तीचा असा..सर्वच बहिणींमध्ये शुभा ही अत्यंत लावण्यवती अशी..

तिला कायमच छळण्यात अग्रेसर असा शकुनी..

काल भीष्मांना कोणतं रहस्य समजलं होतं?

अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं, ते अचंबित करणारं होतं. 

गांधारीच्या जन्म पत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्यूचा योग होता. यावर उपाय म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा, असं राजज्योतिषानं सुचवलं. 

अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरू कुलात कोणालाही देण्यात आली नाही..

हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. बोकडाशी लग्न लावून देऊन त्याचा बळी दिल्यानंतर आणलेली कुलवधू ही एक अर्थानं विधवा ( हे पितामहांचे त्यावेळचे विचार असावेत, आत्यंतिक संतापापोटी आलेले) अशी, हे उद्या जगाला समजलं तर सगळीकडं आपली छी थू होईल या संतापानं त्यांच्या मस्तकात विचारांच्या ठिणग्या पडू लागल्या..

त्यांनी विचार केला की मी समस्त सुबल कुटुंबाचा उच्छेद केला तर हे गुपित कोणाला कधीच समजणार नाही हा उद्देश..

त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्विकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं..

फसवणुकीनं संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि सर्व भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्यांना तळघरात डांबलं. गांधारीनं खूप विनवण्या केल्या, पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला.

बंदिखान्यात असणार्‍या सुबलाला. त्याच्या पुत्रांना भोजन म्हणून दररोज केवळ एक मूठ्भर भात दिला जात असे..या कृतीमागं असणारा भीष्मांचा उद्देश सुबलाच्या लक्षात आला..

तो आपल्या पुत्रांना म्हणाला, ‘एखाद्या कुटुंबाची हत्या करणं म्हणजे अधर्म हे धर्मज्ञ असणार्‍या भीष्माला माहिती आहे. तेव्हा धर्मानं घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग न करता आपल्या सर्वांना मारुन टाकण्याचा हा मार्ग भीष्मांनी शोधून काढलाय..भीष्म आपल्याला रोज  अन्न देतात हे खरं असलं तरीही आपल्याला दिलं जाणारं अन्न इतकं अल्प असतं की, आपली उपासमार होते..अन शेवटी आपण सर्व उपासमारीनंच मरणार आहोत हे नक्की.या परिस्थितीतून आपण काहीही मार्ग काढू शकत नाही.

आपण भीष्मांकडं जे अन्न देताय, त्यापेक्षा जास्त अन्‍न द्या हे सांगणां म्हणजे भीक मागण्यासारखं आहे..यापेक्षा अपमानाची गोष्ट दुसरी कोणतीही नसेल..
त्यापेक्षा उपासमारीनं मरण आलेलं पत्करलं..
तसंच पलायन करणं हेही अनुचित, क्षात्रधर्माला अनुसरुन नाही..'

काळ उलटत गेला..कारावासात असलेल्या सुबल व सुबलपुत्रांची शारीरिक अवस्था खालावत गेली..

अन त्यावरुन सुरु झाले भांडणतंटे..

जगभरात व इतिहासात जेवढी म्हणून युद्धं झाली आहेत ती,जमीन, धनसंपत्ती, स्त्री व उपासमार..अन्नासाठी.

तेच झालं मिळणार्‍या मूठभर अन्नासाठी सर्वांमध्ये भांडणं सुरु झाली..
क्षुधा व्याकुळ व क्षीण अशा सुबलानं या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या पुत्रांपुढं एक विचार मांडला..

सुबल म्हणाला, ‘ आपल्यापैकी जो कोणी सर्वाधिक बुद्धिमान असणार्‍यानं एकट्यानंच हा भात खाऊन दिवस कंठावेत..
मात्र, एका अटीवर..
त्यानं आपल्यावर झालेल्या या अन्यायाला कधीही विसरता कामा नये..इतकंच नव्हे तर, त्यानं भीष्मांचा सूड घेण्यासाठीच फक्त जीवित राहावं..
जीवनाचं अंतिम ध्येय केवळ हेच राहिल..'

सुबलाची ही योजना त्याच्या पुत्रांना मान्य झाली..सर्वांनीच टाचा घासून मरण्यापेक्षा एकानं कोणी जीवित राहून हा सूड घ्यावा ही योजना सर्वांनाच पटली.त्यानुसार सर्वात तरुण अशा सौबल उर्फ शकुनी या सुबलाच्या पुत्राची निवड झाली..दिलं जाणारं सर्व अन्न शकुनि एकटाच खाऊ लागला..अन कालांतरानं सुबल कुटुंबातील इतर सदस्य हे उपासमारीमुळं तडफडून मेले.. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीनं विलाप केला, पितामहांची करूणा भाकली. पण ते द्रवले नाहीत. होता-होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला.

परंतु प्राण सोडण्यापूर्वी सुबलानं, शकुनीला बोलावून जवळ असणार्‍या लोखंडाच्या दंडाचा आघात त्याच्या पायावर केला..साहजिकच शकुनीच्या घोट्याचं हाड मोडलं..शकुनिच्या मोडलेल्या घोट्याकडं बघून सुबल त्याला म्हणाला,

'माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील. पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे, हे लक्षात असू देत.
तू आता आयुष्यभर लंगडत चालशील..अन प्रत्येक पाऊल टाकताना तू कुरुंनी आपल्या कुटुंबावर केलेल्या अन्यायाची आठवण ठेवशील..त्यांनी केलेल्या अपराधांची आठवण ठेवून त्यांना तू कधीही क्षमाही करु नकोस..

तुझा हा मोडलेला पाय, प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील...'

थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला. 

शकुनीला असणारी द्यूताची आत्यंतिक आवड ही सर्वांना माहिती होती..लहानपणापासून द्यूतक्रीडा व त्यातून लोकांना लुबाडणं हे सर्वश्रुत होतंच..

त्याच आवडीचा आधार घेत, सुबल त्याला म्हणाला, ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या बोटांच्या हाडांपासून तू द्यूतात वापरले जाणारे फासे घडव..या बोटांच्या हाडांमध्ये कुरुकुलाबद्दल मला असलेला सारा संताप व क्लेश उतरले आहेत.अन एवढंच नव्हे तर, हे फासे तुझ्या हुकुमाचे ताबेदार असतील..तुला हवं असणारं दान प्रत्येक वेळी पडत जाईल..
परिणामी, या फाशांच्या साहाय्यानं तू द्यूताचा प्रत्येक डाव जिंकत जाशील..'

भावांच्या मृत्यूंनंतर पित्याच्याही मृत्युनं गांधारी कोसळली. शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीनं मरू द्या, असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली. 

पितामहांना तोवर आपल्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबाबत संदेह वाटू लागला होता. त्यांनी शकुनीला अभय दिलं... शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला...
भीष्मांनी इतर मुलांबरोबरच त्याचं पालनपोषणही केलं..

शकुनि आपणा कुरुकुलाचं हित चिंतणारे आहोत हे दर्शवत राहिला...
पणा भीष्माच्या आधिपत्याखाली वाढणार्‍या या कुळाचा सत्यानाश कसा घडवता येईल हा विचार सतत त्याच्या मनात राहिला..अन त्या दिशेनं त्याची पावलं चालत राहिली.. आणि पुढं सर्वज्ञात महाभारत घडलं...

गांधारीच्या मनातही कमी गाठी नव्हत्या..तिच्या संपूर्ण कुटुंबाची भीष्मांनी केलेली वाताहत कायमच धगधगत राहिली.

कुंती नंतर माद्री यांचे विवाह झाले..

तिन्ही विवाहांच्या तर्‍हा वेगळ्या..तिचा विवाह ज्या तर्‍हेनं झाला त्याबद्दल तिच्या मनी एक खंतही होती..आपणा या कुलात सम्राज्ञी म्हणून आलो असलो तरीही आपला विवाह साधेपणानं झाला व खटकणारी गोष्ट म्हणजे विवाहाचा सर्व खर्च तिच्या पित्याला करावा लागला होता..म्हणजे सुबल कुल योग्यतेचं नव्हतं का?
मानभंगाचं शल्य कायमच तिच्या मनात राहिलं..

शकुनीनं कौरव-पांडवांमध्ये कलह माजवला, जो की दोन्ही परिवारांना फक्त विनाशाकडे घेऊन गेला..

#शकुनी_काय_आहे?

शकुनी ही मूर्तिमंत खलप्रवृत्ती आहे...नकारात्मकता आहे..
चांगलं न बघवण्याची ही वृत्ती..

गांधारीच्याच एका आत्मकथनात, गांधारी लहान असतानाच शकुनीनं तिला कमळांच्या पुष्करिणीत ढकलून दिलं अन तिला वाचवायला जाणार्‍य बहिणींना त्यानं घाबरवलं, तुम्ही गेलात तर शुभा तुम्हालाही आत ओढेल..

घाबरवणं, भीती घालून न घडणार्‍या गोष्टीही मनात ठसवू पाहणार्‍या या वृत्तीचा जनक शकुनी असावा..

#धृतराष्ट्र...सतत आपल्या अंधपणाचा गंड बाळगून त्याबद्दल सहानुभूती मिळवण्यासाठी आक्रंदणारा..

सतत परिस्थितीला दोष देत रडत राहण्याची वृत्ती म्हणाजे धृतराष्ट्र..

महाभारतातली ही पात्रं, एकेक वृत्तीची उदाहरणं आहेत.

कुरुकुलाला संपवण्यासाठी कारणीभूत असणार्‍यात, भीष्म सर्वात आधी..

समस्त कुरुकुलाच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं ते कुरुकुलच..

त्यातली प्रत्येक व्यक्ती..

शांतनुपासून ते शकुनीपर्यंत,अश्वत्थाम्यापर्यंत.
भीष्मही यातून सुटलेले नाहीत..

न विचार करता केलेली प्रतिज्ञा, त्याचा परिणाम किती भयंकर होऊ शकतो हा विचार न करता ती केली..

माणसाला असणारा मोह, किंवा माणसाचा ह्व्यास हा व हाच त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो, हा महाभारताचा सारांश आहे..

कुरुकुल म्हणाजे मानवी जीवन..अन ही सर्व त्यातल्या चांगल्या वाईट वृत्ती..

बारकाईनं विचार केला तर महाभारतात सारे प्रसंग, साऱ्या घटना, साऱ्या कथा या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या , सर्व भावभावनांना स्थान देणाऱ्या आहेत. 

महाभारतातही शृंगारापासून शांतरसापर्यंत साऱ्या रसांचा आविष्कार सहजपणे घडताना दिसतो. 


#तळटीप:-

कालपासून द्यूतक्रीडेचे भाग दूरदर्शनवर दाखवत आहेत..

त्यात एक प्रसंग असा आहे, शकुनी ही माझी सेना आहे, दुर्योधन.
पण ती तुझ्याकडे असू देत.
द्यूतक्रीडेच्या वेळी मला दे'

जेव्हा शकुनी माझ्या वतीनं फासे टाकेल हे दुर्योधंन म्हणतो तेव्हा विदुर काय म्हणतात बघितलंय का?

विदुर म्हणतात, द्यूत दुर्योधनाकडच्या फाशांनी होईल..

अन इथं शकुनीचा डाव बरोबर लागू पडतो.
विदुरांना जो संशय असतो,शकुनीच्या चलाखीचा तो बरोबर असतो...

पण शकुनी चलाखी करतोच..
त्याचे फासे दुर्योधनाकडे दिलेले असतात,जे विदुरांना माहिती नसतं.
तेच,सुबलाच्या अस्थीपासून केलेले.