Friday, 22 March 2019

तुकाराम महाराज #तुकाराम_#तुकाराम_बीज

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पशुपक्ष्यांशी सोयरिक जोडणारे हे संतकवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात देहूच्या डोंगरावर जात असत. तेव्हा ते त्या डोंगरावरील झाडांशी व पशुपक्ष्यांशी एवढा तादात्म्य पावत की ते वृक्षवेली पशुपक्षी हे बंधू सखा भगिनी, माता पिता सखी वाटत असत. त्यांच्याशी ते मग आपल्या मनातील सुखदु:ख व्यक्त करीत असत आणि मग निसर्गाच्या सहवासात त्यांना एकांतवासात जे परमसुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत असत. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन त्यांना साथ देत असत, त्यात ते इतके तल्लीन होत की सारी संसाराची दु:खे विसरत असे.
वृक्षवल्ली हे आपलेच, कुटुंबीय आहेत असे मानणारे तुकारामासारखे इतरही संतकवी आपल्याला संत साहित्यात भेटतात. संत सावता माळी तर शेतात आलेल्या फळभाज्यांना आपले दैवत मानीत.
‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणून निसर्गावर प्रेम करीतच त्यांनी आपला भक्तीचा मळा फुलविला होता. तर बाह्यरंगापेक्षा अंतरंग पाहा हे सांगणा-या चोखोबांनी :
‘ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा
काय भुललासि वरलिया रंगा’’ हे सांगून भक्ती रसात उसाचा गोडवा आणला. तव वृक्षवल्लींची उपमा देताना ‘‘मराठीचि वेलू गेला गगनावरी’ सांगताना त्यांनी निसर्गाशी नेहमीच जवळीक केली आहे. रामदासांचं तर इतकं बारीक निरीक्षण होतं की त्यांनी दासबोधामध्ये औषधी झाडांची यादीच दिली आहे. पशुपक्ष्यांसंबंधीचा संदर्भ देताना मुंगी उडाली आकाशी
तिने गिळीले सूर्याशी’ हे आगळे आध्यात्म सांगितले आहे. तर आईच्या प्रेमाचा महिमा सांगताना ‘‘घार उडते आकाशी। चित्त तिचे पिलापाशी’’ असं उदाहरण दिले आहे. आधुनिक मराठीत ख-या अर्थाने निसर्गाशी समरस झालेले एकमेव कवी म्हणजे बालकवी. त्यांनी सारा निसर्गच आपल्या कवितेत आणला. ते नुसते उपमा देत बसले नाहीत, तर निसर्गाच्या भाषेतूनच ते बोलत असत. मराठीत अनेकांनी निसर्ग कविता लिहिल्या आहेत. पण निसर्गाशी ख-या अर्थाने फक्त बालकवीच समरस झाले. त्यावेळी पर्यावरणाचा दिवस साजरा होत नसे किंवा झाडे लावा ही मोहीमही नसे. पण गावी आपल्या शेतात काम करताना शेतकरी एक तरी झाड लावीत असे, बांधावर झाड लावणे हा त्यांच्या शेतीचाच एक भाग होता.
खरं तर आपणा सगळ्यांनाच निसर्गाची आवड आहे. परंतु आपण आळस करतो आणि आपण दूरच्या नातेवाइकांना जसे विसरतो तसे निसर्गालाही विसरतो. पर्यटनामुळे हल्ली आम्ही वनसहली काढू लागलो आहोत, परंतु तेथे निसर्गाशी जवळीक साधण्यापेक्षा फक्त मौजमजा केली जाते. त्यामुळे उलट निसर्गाला त्रास होऊ लागला असून जंगलात कचरा आणि बाटल्यांचा खच पडू लागला.. निसर्गापासून काही न शिकता आपण त्यापासून केवळ आनंदाची अपेक्षा करतो.
झाडाचे संवर्धन हे ३६५ दिवस करणे हे खरे पर्यावरण! खरे पर्यावरण म्हणजे शहरातून जंगलात जाणे नव्हे तर जंगलाला आपल्या शहरात आणणे हे महत्त्वाचे आहे. केवळ एक दिवस रोप लावणे म्हणजे पर्यावरण दिन संपत नाही. आपल्या घराच्या अंगणात किंवा परसात दरवर्षी एकतरी झाड लावणे आणि ते वाढविणे म्हणजे पर्यावरण आयुष्यात पाळणे, एक झाड तोडले तर दोन झाडे लावा हा नियम आपण पाळत नाही. लहानपणी आम्ही शाळेत १५ ऑगस्टला झाडे लावीत असू. ती चळवळ आता पर्यावरण दिनात पाळली जात आहे. आता शाळेत गेलो तर हे झाड आपण लावले हे अभिमानाने सांगू शकतो. नुसते झाड लावणे महत्त्वाचे नाही त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून कविवर्य ग. दि. माडगुळकर म्हणतात,
हाती नाही बळ
दारी नाही आड
त्याने फुलझाड
लावू नये।।

Tuesday, 12 March 2019

Jobs in Pune

डायरेक्ट वॉक-इन
कला, विज्ञान आणि वाणिज्य आणि सर्व ग्रॅज्युएट्स केवळ 201 9 पास
कंपनीचे नाव: विप्रो
शिक्षण: बीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीकॉम, बीएससी, बीसीए, बीसीएम
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी
https://t.co/vDpJMyeoxU


Monday, 11 March 2019

Jobs in Pune

पदाचे नाव: अँप्लिकेशन अभियंता
कंपनीचे नाव: हनीवेल
ठिकाण:पुणे
शिक्षण: इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी
https://honeywell.csod.com/ats/careersite/JobDetails.aspx?id=184177&source=IND&site=1

स्थानः 56 आणि 57 हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे, एमएच 411013 IND

--सुवर्णसंधी (फक्त व्हाट्सअप) : +91 96076 98946--

Monday, 18 February 2019

कविता-रूद्रास आवाहन, कवि-भा.रा.तांबे

आपल्याला भा रा तांब्याची असलेली एक कविता शेअर करतोय. आजच्या परिस्थितीत किती योग्य आहे.

रुद्रास आवाहन

डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।

पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।

जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।

पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।

Friday, 15 February 2019

#pulwama terrorist attack

निशब्द झाल्या जाणिवा
थिजून गेले शब्द
याच नेत्रांनी पाहीले
माझ्या शुरांचे रक्त
असा आज खंत करत राहीलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

फडताळातील बंदूक
जर खोटी नसती
पहिली गोळी आज
मिच झाडली असती
लाहोरमधली होळी आज खेळून आलो असतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

 न जाऊ दिले असते
शुरांचे बलिदान व्यर्थ
असा घडवला असता
शिवबा शब्दाचा अर्थ
दुर्दैवाने आज विलाप करीत बसलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

प्रेमाची अनं त्यागाची फुले
आज अश्रूंची झाली
त्याच फुलांनी आज
 श्रद्धांजली वाहिली
मनातून आज चडफडत राहिलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

शब्द आले थांबा सर , हरू नका
करू नका तुम्ही खंत
सिमेवर अजूनही लढतो आहे
तुमचा  विद्यार्थी शुर जातिवंत
फक्त एकच सैनिक घडला असता
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाला असता

 जशास तसे, शिकवन तुमची
आहे आमीच्या ठायी
बलिदान व्यर्थ   मित्रांचे
आम्ही जाऊच देणार नाही
आकाशातले हे तारे कसे घडले असते
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाले असते

उठलो मुला , जागा झालो
कळले आज मर्म
लाख पेटल्या जाणिवा जरी
माणवता हाच खरा धर्म
देशाची शकले करणाऱ्यांना तेजस्वी उत्तर देईन
इथून पुढे फक्त सैनिकच घडवत राहीन...

 *विनम्र श्रद्धांजली*
💐💐💐💐💐💐💐💐

Competitive exam स्पर्धा परीक्षा

*स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण - शब्दविचार -* १
30| Feb 15, 2019, 04.00 AM IST

*वैशाली कार्लेकर*

शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ......... मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून उतरलेले, पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेले आणि जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरसाज दिलेले हे अजरामर गीत तुम्हाला माहीत असेलच. व्याकरणातला शब्दविचार शिकतानाही याच गाण्यातील 'शब्दांच्या पलीकडले' ही ओळ आठवावी म्हणजे शब्दविचार कळून जाईल. कारण व्याकरणात प्रत्येक स्वतंत्र 'शब्दाच्या पलीकडे' जाऊन त्या शब्दाद्वारे वाक्यात कोणते कार्य घडले आहे, त्या संदर्भावर त्या शब्दाची जात (प्रकार) अवलंबून असते. थोडक्यात एक विशिष्ट शब्द म्हणजे त्याची नेहमी हीच विशिष्ट जात असेल असे गृहीत धरता येत नाही. यासाठी एक उदाहरण पाहू या.

१ दशरथाने कैकयीला दोन वर दिले. (नाम )

२. तू त्या राजपुत्राला वर. (क्रियापद)

3. पक्षी झाडावर बसतो. (शब्दयोगी अव्यय)

४. बाण खालून वर गेला. (क्रियाविशेषण)

या वाक्यांमध्ये 'वर' हा एकच शब्द वाक्यात विविध कार्ये करतो म्हणूनच त्याला वेगवेगळ्या शब्दजातींची नावे दिली आहेत. म्हणूनच शब्दाचा विचार करताना आपली ही मनोभूमिका तयार झाली की शब्दांच्या जाती समजणे सोपे जाते.

आता आपण सर्वप्रथम शब्दाची व्याकरणिक व्याख्या पाहूया.

शब्द - ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला, तर त्याला शब्द असे म्हणतात.

उदा. 'म, क, ळ' या तीन अक्षरांची 'कमळ' अशा क्रमाने रचना केली तर मराठी भाषेत त्याचा अर्थबोध होतो व त्यामुळे तो मराठी भाषेतला अर्थपूर्ण शब्द आहे असे म्हणता येते. मात्र मकळ, कळम अशा रचना मराठीत अर्थपूर्ण होत नसल्याने त्यांना शब्द म्हणता येणार नाहीत.

आता शब्दांच्या मुख्य आठ जाती पाहू या.

शब्दांच्या जाती

शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांच्या पुढीलप्रमाणे आठ जाती ठरतात.

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय

यातील पहिल्या चार जाती सव्यय किंवा विकारी आहेत, कारण त्यांच्यामध्ये बदल होतो, तर पुढील चार जाती अव्यय किंवा अविकारी आहेत. त्यांच्यामध्ये बदल होत नाहीत.

शब्दांच्या जातींच्या व्याख्या आणि उदाहरणे तुम्ही संदर्भ पुस्तकातून अभ्यासालच. इथे आपण त्यांच्याविषयी काही विशेष माहिती पाहूया.

नामांचे धर्मवाचक आणि धर्मिवाचक असे वर्गीकरण असून सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम असे तीन प्रकार आहेत.

नामाच्या मूळ प्रकारांचेही एकमेकांच्या जागी कार्य होते. तसेच इतर शब्दजातीही काहीवेळा नामरूपात येतात. उदा. मी आत्ताच नगरहून आलो. (नगर- मूळचे सामान्यनाम, येथे विशेषनाम ) शहाण्याला शब्दांचा मार ( शहाणा- मूळचे विशेषण, येथे सामान्यनाम)

लिंग, वचन आणि विभक्तीमुळे नामाच्या रुपात जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात.

मराठीत ३ लिंगे मानतात. निर्जीव वस्तूंची लिंगे काल्पनिक आहेत, त्यामागे काही बाबतीत तत्त्व आढळते, तर अनेक अपवाद आढळतात. त्यामुळे मराठी भाषा ऐकून आणि बोलण्यात तिचा वारंवार उपयोग करूनच ही लिंगव्यवस्था समजून घेता येते.

मराठीत २ वचने आहेत. वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते. जोडपे, त्रिकूट, ढीग, रास, समिती, सैन्य यातून अनेकत्व किंवा समूह दर्शविला गेला तरी तो एक गट मानून त्याचे एकवचन मानले जाते. मात्र २ किंवा त्याहून जास्त जोडपी, त्रिकुटे, ढीग असले तर अनेकवचनी मानली जातात.

सामान्यरूपे लक्षात येण्यासाठी त्या नामाचा वाक्यात उपयोग करून पाहावा. वर्ग या शब्दाचे सामान्यरूप 'वर्गा' आहे, वर्गात किंवा वर्गाला नव्हे. या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य (अनिश्चित) सर्वनाम यातील फरक - उदा. कोण रे तू? (प्रश्नार्थक सर्वनाम), तिकडे कोण आहे, ते मला माहीत नाही. (सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम)

आपण आणि स्वतः या ही पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम या दोन्ही प्रकारात आढळतात. त्यांच्यातील फरक लक्षात घेणे.

विशेषणांचे मुख्य प्रकार

अ) सिद्ध विशेषणे - १. गुणविशेषणे- मोठी मुले, २. संख्याविशेषणे -दहा मुली, ३. सार्वनामिक विशेषणे -माझे पुस्तक, ब) साधित विशेषणे - १. नामसाधित विशेषणे - सातारी पेढे, २. धातुसाधित विशेषणे - हसरी मुलगी, ३. अव्ययसाधित विशेषणे - वरचा मजला

क्रियापदाचा अभ्यास करताना धातू, धातुसाधिते, कर्ता, कर्म या सर्व संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणादाखल एकेक वाक्य लक्षात घेऊन सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध क्रियापदे लक्षात घेणे आवश्यक आहे. मो. रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकामध्ये क्रियापदविचाराची सविस्तर माहिती आहे.

काळांच्या उपप्रकारांमधील अपूर्ण काळ आणि रीतिकाळ यांच्यातील फरक नीट समजून घ्यावा. उदा. तो कविता म्हणत असेल -(भविष्यात क्रिया चालू असल्याचे दिसते -अपूर्ण भविष्यकाळ) तो कविता म्हणत राहील/जाईल. (भविष्यात क्रिया सतत करत राहण्याची रीत समजते - रीति भविष्यकाळ)

क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये आणि केवलप्रयोगी अव्यये या सर्व अव्ययप्रकारांचे त्यांच्या अर्थावरून व स्वरूपावरून विविध प्रकार आहेत. ते बारकाईने अभ्यासावेत.

अशाप्रकारे सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे शब्दांचे वाक्यातील कार्य समजून जात निश्चित केली तर शब्दविचार हा संपूर्ण घटक अभ्यासासाठी सोपा आहे. पुढील लेखामध्ये आपण समास, शब्दसिद्धी आणि शब्दशक्ती या घटकांची माहिती घेऊया.

Sunday, 27 January 2019

Fan dance पंखा कवायत

https://youtu.be/ogWUUNoYoAQ 
70व्या प्रजासत्ताक दिनाच्या* निमित्ताने *पंखा नृत्य* *fan drill* सादरीकरण

▪जिल्हा परिषद प्राथमिक शाळा *शेळका धानोरा* ता. कळंब जि. उस्मानाबाद

▪Video पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि *LIKE* & *SUBSCRIBE* करा.

Sunday, 20 January 2019

School competition शालेय स्पर्धा






जि.प.प्राथमिक शाळा *शेळका धानोरा* येथे *प्रजासत्ताक दिनानिमित्त* *संगीत खुर्ची, लिंबू चमचा, स्मरण शक्ती व रंगभरण स्पर्धा* घेण्यात आल्या.

Wednesday, 16 January 2019

Fan dance,बाल आनंद मेळावा

[13/01 16:14] rameshwar jagdale: https://youtu.be/-178NqCKKhM
बाल आनंद मेळावा, शेळका धानोरा.
अतिशय सुंदर vdo आहे.
एकदा अवश्य पहा.
Please subscribe my YouTube channel.
Like and share.
[16/01 16:46] rameshwar jagdale: https://youtu.be/ML23C4L8yXg 
Fan DRILL,पंखा कवायत, शेळका धानोरा.
अतिशय सुंदर vdo आहे.
एकदा अवश्य पहा.
Please subscribe my YouTube channel.
Like and share.

Thursday, 25 October 2018

जि.प.प्राथमिक शाळा,शेळका धानोरा शाळेत वेशभूषा_स्पर्धा FASHION SHOW

https://youtu.be/v3siKAMCTGM
जि.प.प्राथमिक शाळा,शेळका धानोरा शाळेत वेशभूषा_स्पर्धा FASHION SHOW आयोजित केला होता.
त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आपापली वेशभूषा सुंदर पणे सादर केली.
तसेंच यावेळी गोवर रूबेला लसीकरण जनजागृती साठी रॅली काढण्यात आली.

Monday, 22 October 2018

Women power नवरात्री -जागर स्त्री शक्तीचा

https://youtu.be/mFhCauntRic
जि. प.प्राथमिक शाळा #शेळका_धानोरा येथे #नवरात्री निमित्ताने #जागर_स्त्री_शक्तीचा कार्यक्रमांतर्गत महिलांच्या विविध स्पर्धा व मनोरंजक खेळ घेण्यात आले.
#व्हिडीओ_आवडल्यास_आमच्या_चॅनलला_जरूर_subscribe_करा.

Saturday, 29 September 2018

नागिण किंवा नागवेढा रोगाविषयी माहिती

नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का?

‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शनला नागीण (हर्पीस झोस्टर) असे म्हणतात, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्याही होतात. लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही.
पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ट नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्य भरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपीसारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता, अशा अनेक कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू पुन्हा जागृत होऊ शकतो. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.
● नागिणीच्या संसर्गाचे प्रकार :
 १. हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार १ (HSV-1)
२. हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार २ (HSV-2)
हे संसर्ग सुक्ष्मदर्शीतून एकसमान दिसतात आणि ह्यांचा तोंड व जननेंद्रियांच्या भागात संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारणतः (HSV-1) हा कमरेच्यावरच्या भागात उद्भवतो व (HSV-2) हा कमरेच्या खालील भागात उद्भवतो.
● गुप्तांगाजवळील नागीण :
गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो. सामान्यतः एखाद्या व्यक्तीला, गुप्तांगाचे एचएसव्ही–2 चे संक्रमण असलेल्या व्यक्तीकडून समागमाच्या दरम्यानच एचएसव्ही-2 चे संक्रमण होते.  ज्या जोडीदाराला न दिसणारा फोड आहे आणि आपण संक्रमित आहोत किंवा नाही याची माहिती नसलेल्या जोडीदाराकडून संक्रमण होऊ शकते.
● गुप्तांगाच्या नागिणीची चिन्हे आणि लक्षणे :
‘व्हेरिसोला ऑस्टर’मुळे होणारी नागीण ही एकाच बाजूला होते व तिचा विळखा पडत नाही. परंतु ‘हर्पिस सिम्प्लेक्‍स’मुळे होणारी नागीण ही दोन्ही बाजूंना होते व पसरूही शकते. ही नागीण प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांत आढळून येते. प्रतिकारशक्ती कमी असल्याने ही नागीण पसरते व गंभीर स्वरूपात होऊ शकते. त्यामुळे ‘नागिणीचा विळखा पडल्यास गंभीर आजार आहे’ हा समज रूढ झाला असावा.
या नागिणीवरदेखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.
नागिणीच्या रोगाची लक्षणे Image 
● रोगनिदान :
हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो.
सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत. नागीण हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. जर डोळयात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.
● साधारण लक्षणे: 
१. सुरुवातील नागिणीच्या जागी फक्त वेदना किंवा आग होते. दोन-चार दिवसांत किंवा कधीकधी एका रात्रीतही भाजल्यावर येतात, तसे पाण्याचे बारीक बारीक फोड येतात. हे फोड एकत्र गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि एका विशिष्ट दिशेने वाढत जातात.
२. नागिणीची प्रमुख तीन लक्षणे म्हणजे आग, वेदना किंवा खाज.
३. नागीण झाल्यावर तो भाग लालसर होतो, आतून दडदडीत होतो. अंगावर कपडे सहन होत नाहीत. त्या बाजूवर झोपताही येत नाही. जरासा धक्का लागला तरी डोळ्यांतून पाणी येते, संपूर्ण अंगाची आग होते, काही वेळा ताप येतो, झोप लागत नाही. काही दिवसांनंतर हे फोड मोठे होतात. शेजारचे छोटे छोटे फोड एकत्र होऊन मोठे फोड तयार होतात. नंतर ते फुटतात.
४. काही वेळा या फोडांमध्ये पूसुद्धा होतो. फुटल्यावर त्यातील पाणी निघून जाते आणि वरची त्वचा निघून जाऊन आतील मांस दिसू लागते. नंतर त्या मांसावर खपली येते, ती सुकून काळी पडते आणि आत नवीन त्वचा आल्यावर ती खपली गळून पडते.
● नागिणीच्या विशिष्ट लक्षणे :
– पाठदुखी.
– नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटत राहते.
– दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात
– त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो.
– त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो.
– फ्लूमध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशीही लक्षणे यात असतात.
● हा आजार किती दिवसांपर्यंत असतो? 
१. नागीण किती प्रमाणात झाली आहे, त्यावर त्याचा काळ अवलंबून असतो. पण साधारणतः नागिणीला चार आठवडे तरी लागतात. कांजिण्यांप्रमाणेच याचा बरा होण्याचा प्रवास असतो. फक्त त्या एका आठवड्यात कमी होतात, तर नागीण बरी व्हायला वेळ लागतो. नागीण आयुष्यात शक्यतो एकदाच होते.
२. एड्स किंवा जननेंद्रियांच्या सांसर्गिक रोगांमुळे होणारी नागीण मात्र वारंवार होऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास किंवा पथ्य न केल्यास नागीण बरी व्हायला खूप वेळ लागतो.
३. नागिणीबद्दल एक रूढ समज म्हणजे नागीण दोन्ही बाजूंनी आल्यास व विळखा पूर्ण झाल्यास तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार समजला जातो व त्यात रुग्ण दगावतो. यात कितपत तथ्य आहे?
कुणी घरगुती उपचार करतात; मंत्र-तंत्रदेखील केले जातात. या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत.
४. वृद्धापकाळात झालेली नागीण बरी व्हायलाही खूप वेळ लागतो. अत्यंत वाईट बाब म्हणजे अशी नागीण बरी झाल्यानंतरही त्या जागेवरची आग किंवा वेदना या नंतर कितीही उपाय योजना केल्या तरी जन्मभर पाठ सोडत नाहीत.
५. काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.
६. साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.
● नागिणीसाठी प्रचलित उपचार आणि गैरसमज
१. तंत्र मंत्र ऊतारा हे सर्व अंधश्रद्धा आहेत. आजच्या कलियुगात आणि आधुनिक काळातही अगदी सुशिक्षित व्यक्तीही अनेक भ्रामक कथांना बळी पडत असतात. नागीण या रोगाबद्दलही अशाच अनेक भ्रामक कल्पना आहेत.
२. हा विकार कितीही भयंकर असला, तरी योग्य व वेळीच केलेल्या आयुर्वेदिक उपचारांनी तो निश्चितच पूर्ण बरा होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात ‘कक्षा’, ‘विसर्प’, ‘अग्निरोहिणी’ अशा नावांनी उल्लेख असलेल्या या विकाराला आपण नागीण, धावरे या नावांनी ओळखतो.
३. पूर्वी विषाणूंवर परिणामकारक औषधे नसल्यामुळे साधारणपणे अशा सर्व आजारांबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक भीती होती. आता नागिणीवर देखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.
● नागीण होण्याची कारणे
नागीण झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढवणाऱ्या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरण, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग नागीण होण्यास कारणीभूत असतात.
● हा आजार शरीरावर कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकतो? 
डोक्यात, भुवईपासून कपाळावर, कानापासून मानेवर, छातीपासून पाठीवर, पोटापासून पाठीवर, खांद्यापासून हातावर किंवा कंबरेपासून पावलापर्यंत, स्त्री व पुरूषांच्या जननेंद्रियांवर हा आजार विळखा घालू घालण्याची जास्त शक्यता असते.
● आयुर्वेदिक उपचार :
नागिणीत वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते.
१. उंबाराच्या ४ पानांचा काढा करुन सकाळीच उपाशी पोटी घ्या.
२. गुळवेल सत्त्व           १५मिली
महामंजिंष्टादि काढा  १५मिली हे दुपारी घ्या.
३. खदिरारिष्ट               १५ml
कायाकल्प वटी       २ गोळ्या
संशमनी वटी           २ गोळ्या हे सायंकाळी घ्या.
४. ऊंबराची मुळी घासुन, दुर्वांचा रस करुन, कोरफडीचा गर हे मलम म्हणून बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात.
● पथ्य :
१. हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बरे वाटेपर्यंत पूर्ण बंद करणे आवश्यक आहे.
२. पोट साफ ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.
३. महत्त्वाचे म्हणजे आजाराच्या काळात सुरुवातीचे आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. नागीण काही प्रमाणात संसर्गजन्य आहे. नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना  नागीण नाही, पण कांजिण्या मात्र येऊ शकतात.

लेख : राजु गोल्हार ( आरोग्यसंवाद )
९९२२३१५५५५
संपादन व मुद्रणकार्य : मराठी ब्रेन

Saturday, 8 September 2018

Add name online in voter list मतदार यादीत नाव ऑनलाईन समाविष्ट करण्याची लिंक

मतदार यादीत नाव ऑनलाईन समाविष्ट करण्याची
लिंक
http://www.nvsp.in/Forms/Forms/Form6

मतदार यादीतील  नावाची ऑनलाईन दुरुस्ती लिंक

http://www.nvsp.in/Forms/Forms/Form8


          👉🏻किंवा👈🏻


👉🏻सर्व करिता आता Online Form भरण्याची प्रकिया खालीलप्रमाणे.
प्रथम www.ceo.maharashtra.gov.in वर जाऊन
Online Voter Registration वर Click करणे त्या नंतर
नमुना 6, 6A, 7, 8, 8A असे फॉर्म दिसतील.

👉🏻उदा. नमुना 6 वर गेल्यावर
     State - Maharashtra   
     District - Palghar

     AC -  Vikramgad निवडा

👉🏻त्यानंतर Mandatory Detail मध्ये पुढीलप्रमाणे
प्रथम इंग्लिशमध्ये नाव टाकावे त्याचे आपोआपच प्रादेशिक भाषेत रूपांतर होते जर प्रादेशिक म्हणजेच मराठी भाषेत उदा.

👉🏻Name - Shrikrishan  Vasudev
     नाव       - श्रीकृष्ण वासुदेव

👉🏻Surname - Yadav
     आडनाव     -     यादव

⚡ (जर काना वेलांटी चूक असले तर आपल्या मोबाईलच्या keyboard च्या साहायाने आवश्यक तो बदल करता येतो)

👉🏻पुढे relative name

👉🏻RLT Name - Vasudev Shambhunath

  नातलागचे नाव - वासुदेव शंभुनाथ

👉🏻RLT Surname    - Yadav
     नातलागचे आडनाव - यादव

👉🏻नंतर RTL Type -                         Father, Mother, Husband, Other प्रकार आहे.

तसेच वर दिलेल्या RLT मध्ये शक्यतो आईचे नाव टाकू नये जास्तीत जास्त वडिलांचे नाव टाका म्हणजे पुढे अडचण नको

👉🏻नंतर Date Of Birth
दोन प्रकारे जन्मतारीख टाकता येतात पण दुसरा प्रकारे सोईस्कर आहे.

👉🏻नंतर Gender निवडा

👉🏻नंतर Address
त्यात Current आणि Permnant पण दोन्ही सारखे असेल तर Current Add type केल्यावर

👉🏻Same Above वर Tik करा  म्हणजे वरील पत्ता आपोआप खालीपन येतो

👉🏻नंतर 1) Photo Upload
       
       2) Age proof Upload
       
       3) Address proof Upload
।👉🏻नंतर Village Name
        State Name
        District Name
         आणि
  सदर गावातील वास्तवाचा कालावधी यात जन्मतारीख Copy Past करा

👉🏻Place :
👉🏻Date   :


              ✔Submit

🌟महत्वाची सुचना - Photo व Document यांची size 100 KB पेक्षा कमी असावी.

🌟आवश्यक गोष्टी Cam saccaner
नावाचे App आणि Photo & Picture Resizer App
यांचा वापर करून नमुना 6 फॉर्म हा 5 मिनिटात मोबाईलवर भरता येते.

         
       
                    👆🏻

     💫 🙏🏻धन्यवाद🙏🏻💫