Sunday, 14 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात तीन मृत्यू
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात तीन मृत्यू
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील दोन आणि कारी येथील एक अश्या तिघांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या सहा झाली आहे.
उस्मानाबाद शहरातील देवी मंदिर परिसरातील एका २५ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला होता, त्यानंतर आज ( रविवारी ) उस्मानाबाद शहरातीलच उस्मानपुरा, काकानगर भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा रुग्ण नळदुर्ग येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता, त्यास मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता, असे सांगण्यात आले.
त्यानंतर कारी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या वृद्धास काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यास उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. दहा दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला म्हणून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु त्याचा देखील मृत्यू झालेला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी तीन रुग्ण लातूर, सोलापूर आणि पुणे येथे ऍडमिट आहेत. त्यांची नोंद उस्मानाबाद मध्ये नाही. उर्वरित १४३ पैकी सहा बळी गेले आहेत. त्यात . गेल्या २४ तासात तीन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोना बाधित रुग्ण - १४६
बरे झालेले रुग्ण - १०५
मृत्यू पावलेले रुग्ण - ६
ऍक्टिव्ह रुग्ण - ३५
Saturday, 13 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आज तीन पॉजिटीव्ह
उस्मानाबाद जिल्ह्यात आज तीन पॉजिटीव्ह
भूम एक आणि परंडा दोन जणांना कोरोनाची बाधा
उस्मानाबाद - सलग दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात भूम येथील एक आणि परंडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता १४५ झाली आहे. पैकी १०५ बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७३ जणांचे स्वॅब आज १३ जून रोजी लातूरला पाठवण्यात आले होते,पैकी तीन पॉजिटीव्ह , ७० निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णापैकी एक रुग्ण भूम आणि दुसरे दोन रुग्ण हे परांडा येथील पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. जिल्हयात रुग्णाची संख्या अशी
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण १४५
एकूण बरे झालेले रुग्ण -१०५
उपचार घेत असलेले रुग्ण - ३६
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ४
तालुकानिहाय रुग्ण
उस्मानाबाद - ५९
कळंब- ३६
उमरगा - १६
परंडा - १७
लोहारा -२
वाशी - 0
तुळजापूर -१२
भूम -३
उस्मानाबादेत कोरोनाचा चौथा बळी
उस्मानाबादेत कोरोनाचा चौथा बळी
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील २५ वर्षीय कोरोना बाधित तरुणाचे आज निधन झाले, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या आता चार झाली आहे.उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणास कोरोना झाला होता, तो गेल्या २६ दिवसापासून उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार होता. त्यास ब्लड कॅन्सरचा दुर्धर आजार होता, त्यात कोरोना झाल्यामुळे या तरुणाची प्रकृती नाजूक बनली होती, अखेर त्याचे आज शनिवारी निधन झाले.उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १४२ जणांना कोरोना झाला आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. १४२ पैकी १०५ बरे झाले असून, ३३ रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत.
Friday, 12 June 2020
किडनी स्टोन (मुतखडा) घरेलू उपचार
किडनी स्टोन (मुतखडा)
घरेलू उपचार
किडनी में स्टोन होना एक आम समस्या है. यूरीन में कई रासायनिक तत्व मौजूद होते हैं. यूरिक एसिड, फॉस्फोरस, कैल्शियम और ऑक्जेलिक एसिड. यही सारे रासायनिक तत्व स्टोन बनाने के लिए उत्तरदायी होते हैं.
इसके साथ ही बहुत अधिक मात्रा में विटामिन डी के सेवन से, शरीर में लवणों के असंतुलन से, डीहाइड्रेशन से और अनियमित डाइट की वजह से भी किडनी में स्टोन हो जाता है.
किडनी में स्टोन हो जाने की वजह से पेट में हर वक्त दर्द बना रहता है. इसके अलावा बार-बार यूरीन डिस्चार्ज करना, शौच के दौरान दर्द होना, बहुत ज्यादा पसीना आना और उल्टी होना इसके लक्षण हैं.
हालांकि इसके उपचार के लिए कई तरह की दवाइयां बाजार में उपलब्ध हैं और ऑपरेशन से भी इसका इलाज संभव है लेकिन आप इन घरेलू उपायों को अपनाकर भी किडनी के स्टोन से राहत पा सकते हैं .
घरेलू उपायों के साथ ही ये बेहद जरूरी है कि आप नियमित रूप से 10 गिलास पानी का सेवन करें. स्टोन होने की हालत में कम पानी पीना दर्द और तकलीफ की वजह बन सकता है .
1. लेमन जूस और ऑलिव ऑयल
बरसों से लेमन जूस और ऑलिव ऑयल को मिलाकर उसका सेवन गॉलब्लेडर के स्टोन के लिए किया जाता रहा है लेकिन किडनी के स्टोन में भी ये काफी कारगर है . नींबू के रस में मौजूद सिट्रिक एसिड कैल्शियम बेस वाले स्टोन को तोड़ने का काम करता है और दोबारा बनने से भी रोकता है. इस मिश्रण को बनाने के लिए नींबू के रस और ऑलिव ऑयल को बराबर मात्रा में लेकर मिला लें और दिन में दो से तीन बार इसका सेवन करें.
2. अनार
अनार का जूस और उसके बीज दोनों में ही एस्ट्रीजेंट गुण होता है जो कि किडनी के स्टोन के इलाज में मददगार है. यदि आपकी किडनी में स्टोन है तो प्रतिदिन एक अनार खाना या फिर उसका जूस पीना फायदेमंद हो सकता है. इसके अलावा अनार को फ्रूट-सलाद में भी मिलाकर खाया जा सकता है.
3. तरबूज
मैग्निशियम, फॉस्फेट्स, कार्बोनेट और कैल्शियम से बने किडनी स्टोन के इलाज के लिए तरबूज एक बहुत अच्छा और कारगर उपाय है. तरबूज में पर्याप्त मात्रा में पोटैशियम मौजूद होता है जोकि स्वस्थ किडनी के लिए एक प्रमुख तत्व है. पोटैशियम यूरीन में एसिड लेवल को मेंटेन रखने में मदद करता है. पोटैशियम के साथ ही पानी भी भरपूर होता है जोकि स्टोन को नेचुरल तरीके से शरीर से बाहर निकाल देता है.
4. राजमा
राजमा में भरपूर फाइबर होता है. इसे किडनी बीन्स के नाम से भी जाना जाता है. किडनी बीन्स किडनी और ब्लेडर से जुड़ी हर किस्म की समस्या से राहत दिलाने में कारगर होती है. इसे बनाने से पूर्व जिस पानी में भिगोया जाता है उसे पीने से भी फायदा मिलता है.
5. व्हीट ग्रास
व्हीट ग्रास को पानी में उबालकर ठंडा कर लें. इसके नियमित सेवन से किडनी के स्टोन और किडनी से जुड़ी दूसरी बीमारियों में काफी आराम मिलता है. इसमे कुछ मात्रा में नींबू का रस मिलाकर पीना और बहतर हो सकता है.
Wednesday, 10 June 2020
पालखी सोहळ्याची वाटचाल
हरी ॐ
पालखी सोहळ्याची वाटचाल
पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.
१. आळंदी - पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो.
२. पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.)
३. दिवेघाट - नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते.
४. सासवड - वड म्हणजे सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे.
५. जेजुरी - नंतर पालखी जेजुरीला येते. ज = जितेंद्र ,
जोरी = जास्त त्रास न घेणे.
म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो.
६. वाल्ह्या -भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न झाले पाहिजे. (वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.)
७. लोणंद - त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो.
८. तरडगाव - जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर + रड =तरडगावला येते.
९ फलटण - ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर
१०. बरड - संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे *बरड* जमिनीसारखे होते.
११. नातेपुते - नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्रीविठ्ठलाचा होतो.
१२. माळशिरस - माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस.पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन - प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते.
१३. वेळापूर - त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते.
१४ वाखरी - वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन.
१५. नंतर तो पंढरपूरात जाऊन पांडुरंगमय होतो.
पांडुरंग... पांडुरंग
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻copy/paste whatsapp
कोरोना, कॅन्सर आणि आयुर्वेद
कोरोना, कॅन्सर आणि आयुर्वेद
आपण सर्व कोरोना नामक आजाराला तोंड देत आहोत. जगभरात या आजाराने थैमान घातले आहे आणि आपला भारत देशही त्याला अपवाद नाही. भारतात जवळपास सव्वा दोन लाख रुग्ण कोरोना बाधित आहेत आणि चिंताजनक रित्या दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे.
देशभरामध्ये दरवर्षी लाखो रुग्ण या विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात आणि लाखो नवीन रुग्णाना कॅन्सर चे निदान होते. यातही भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये तंबाखूजन्य कॅन्सरचे प्रमाण भयावह रित्या वाढतच आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग होतो. त्याच बरोबर अन्ननलिकेचा, जठराचा, मोठ्या आतड्यांचा, गुदाचा, यकृताचा, रक्ताचा कर्करोग असे विविध प्रकार भारतात आढळतात.
स्त्रीविशिष्ट अवयवांच्या विचार केला तर 'स्तनांचा कर्करोग' हा एकूण कर्क रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणे आढळतो. अन्य अवयवांचे म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि बीज ग्रंथीचा कर्करोगही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
या सर्व पार्श्वभूमीवर कॅन्सर रूग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण कॅन्सर या आजारामुळे किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी आदि चिकित्सा यांचा शरीरावर घडलेल्या परिणामांमुळे एकूणच कॅन्सर रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. आणि कोरोना या आजाराची आतापर्यंतची वाटचाल लक्षात घेता, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणाऱ्या व्यक्ती यातून चांगल्या पद्धतीने बऱ्या झालेल्या आहेत किंवा त्यांना अजूनपर्यंत बाधा झालेली नाही. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार यांचे नियोजन, मानस स्वास्थ्य जपणे आणि रसायन चिकित्सा यांचा विचार केलेला आहे.
१. आहारामध्ये देशी गायीचे दूध देशी गायीचे तूप यांचा समावेश असावा.
२. जेवण ताजे, सकस असावे.
३. फळ भाज्यांचा आहारात समावेश नेहमी असावा.
यामध्ये पडवळ, दोडका, घोसाळे, कारले, भेंडी, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्या असाव्यात.
४. जेवणामध्ये आवडीनुसार हळद, सुंठ, जिरे, धने आदि मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश असावा.
५. गव्हाचा फुलका किंवा पोळी, ज्वारी, बाजरी यांच्या भाकरी चालतील.
६. जेवणाची वेळ नियमित असावी.
७. शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ कटाक्षाने टाळावे.
८. सध्या पावसाळा असल्यामुळे एकूणच भूक कमी असते, त्यामुळे भुकेच्या प्रमाणातच जेवण करावे.
९. पावसाळा असल्यामुळे पालेभाज्या टाळाव्यात.
◆विहाराचा विचार करता कोरोना आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातच व्यायाम करावा.
◆व्यायाम देखील सहजसोपी योगासने, पूरक हालचाली, दीर्घश्वसन यांचा समावेश असावा.
◆ पावसाळ्यातील गारठा यापासून शरीराचे संरक्षण करावे. ◆दिवसा झोप, रात्री जागरण टाळावे.
★ या आजारामध्ये माणस स्वास्थ्य जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी ओंकार, ध्यान, दीर्घश्वसन किंवा इष्ट देवतेचे चिंतन करावे.
सध्या आवश्यक बाबी म्हणजे मास्क वापरणे, शरीराची वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टंसिंग कटाक्षाने पाळायला हव्यात.
आयुर्वेदामध्ये कॅन्सर रुग्णांना 'रसायन चिकित्सा' अत्यंत उपयुक्त आहे. रुग्णाचे वय, कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे, अग्नि, यांचा विचार करून विविध रसायनांचा वापर करता येऊ शकतो. ही रसायन औषधे व्याधी क्षमता चांगली करणारी असतात, रुग्णाचे बल वाढवणारे असतात, भूक वाढवणारी असतात, त्वचेची कांती, वर्ण वाढवणारी असतात आणि आयुर्वेदात वर्णन केलेले शरीरातील सात धातू - त्या सर्वांना बलवान करणारी असतात. याचे उदाहरण म्हणजे सर्वांचे परिचित असलेल्या च्यवनप्राश अवलेह.
ह्याच बरोबर अन्य रसायन औषधे देखील आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्याने चालू करणे हितावह ठरते. ही औषधे आयुर्वेदीय पद्धतीने शरीराचा विचार करून, कॅन्सर कुठल्या अवयवाचा आहे याचा विचार करून वेगवेगळी असतात.
कॅन्सर रुग्णांमध्ये असलेली पुढची चिंताजनक बाब म्हणजे अन्य अवयवांमध्ये कॅन्सर पसरणे (Metastasis). जेव्हा धातूंचे बल चांगले असते, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तेव्हा या Metastasis ला प्रतिबंध होण्यास मदत होते
Tuesday, 9 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात 14 पॉजिटीव्ह
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 14 पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - गेले दोन दिवस खंड पडलेल्या कोरोना रुग्णात आज एकदम 14 जणांची भर पडली आहे. या बारा जणांमध्ये उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा, काकानगर भागातील 12 आणि नळदुर्ग ता. तुळजापूर येथील दोन जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 137 झाली आहे.जिल्हयात रुग्णाची संख्या अशी उस्मानाबाद जिल्ह्यात
आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण 137
एकूण बरे झालेले रुग्ण -76
उपचार घेत असलेले रुग्ण 58
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
तालुकानिहाय रुग्ण
उस्मानाबाद - 55
कळंब- 33
उमरगा - 16
परंडा - 11
लोहारा - 8
वाशी - 4
तुळजापूर 7
भूम - 3
सूर्यनमस्कार-प्रत्येकासाठी उत्तम व्यायाम
🙏सूर्यनमस्कार-प्रत्येकासाठी उत्तम व्यायाम 🙏
☀️१२ मिनिटात २८८ योगासने☀️
सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.
☀️सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.
एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.
☀️३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट
☀️३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:
☀️वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,
बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.
वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.
इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.
सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?
🌞सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ
सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता
‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.
सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.
🌷 आरोग्यम् धनसंपदा 🌷
Sunday, 7 June 2020
जॉब अपडेट - ७ जुन/२०२०
जॉब अपडेट - ७ जुन/२०२०
https://t.co/KIf17cC67S
https://t.co/LbiRikbaB9
मराठीनोकरी
https://t.co/kVK3qf0CZo
https://t.co/N1z8oPaJFx
https://t.co/XdwGOXYIcs
https://t.co/pEWca224qe
https://t.co/d8QcKgkonj
https://t.co/DTaSsBsqZs
https://t.co/Us2d4PY5R1
https://t.co/nNf785TtYZ
https://t.co/OoLwxfd9y4
https://t.co/4LmlsLjgEQ
#मराठीनोकरी
जॉब अपडेट - ७ जुन २०२०
#मराठीनोकरी
@iamShantanu_D
https://t.co/RhaPcwscTp
https://t.co/MRJNH6DZu
https://t.co/hgbJFMI076
करोना काळात जर कोणाचा जॉब गेला असेल तर काही आय.टी मधल्या ओपनिंग टाकत आहे.
सविस्तर माहिती - जॉब स्किल वाचून Apply करा.सगळ्या पुण्यातील ओपनिंग आहेत.
टीप : सर्व लिंक व्यवस्थित पाहणे.
Saturday, 6 June 2020
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रुग्णाची भर
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रुग्णाची भर
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात शिराढोण ता. कळंब येथील चार, उस्मानाबाद शहर १ आणि सास्तूर ता. लोहारा अश्या सहा रुग्णाचा समावेश आहे.
आज दिनांक 06/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 81 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .
त्यापैकी सहा पॉझिटिव्ह,1 रिजेक्ट व 74 निगेटिव आले आहेत.
पॉझिटिव पेशंट ची माहिती ---
चार पेशंट शिराढ़ोन ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. व एक पेशंट हा उस्मानपुरा उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत.व एक पेशंट सास्तूर येथील असून आठ दिवसापूर्वी पुणे येथून आलेला आहे. आज एकूण सहा नवीन रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात
आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 122
एकूण बरे झालेले रुग्ण - 56
उपचार घेत असलेले रुग्ण -63
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज यांच्या जीवनावर* 🔊 आधारित प्रश्न मंजुषा
https://forms.gle/FwsjfjXFquS2qQSB7 👈
🔊 *शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज यांच्या जीवनावर* 🔊 *आधारित प्रश्न मंजुषा*
🔊 *आयोजक*-जि.प.प्रा.शाळा *शेळका धानोरा* ता.कळंब जि.उस्मानाबाद
🔊 *निळ्या लिंकवर क्लिक करा.*
🔊 *टेस्ट सोडवा.*
🔊 *नांव, वर्ग, शाळा, मोबाईल क्रमांक लिहा.*
🔊 *submit करा.*
🔊 *view score वर क्लिक करा.आपले गुण व चुकलेली उत्तरे पहा.*
Friday, 5 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह ,एकूण रूग्ण 116
उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह ,एकूण रूग्ण 116
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे आजपर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची संख्या ११६ झाली आहे. पैकी ५६ रुग्ण बरे झाले आहेत.
आज ५ जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 जणांचे रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.
त्यापैकी बारा पॉझिटिव्ह,4 inconclusive व 29 निगेटिव्ह आले आहेत.
पॉजिटीव्ह रुग्ण असे
आठ पेशंट शिरढोण ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. व दोन पेशंट हासेगाव ता. कळंब येथील पूर्वीच्या आंदोरा येथील पेशंटच्या संपर्कातील आहेत असे एकूण दहा पेशंट कळंब तालुक्यातील आहेत. व दोन पेशंट ढोकी ता उस्मानाबाद येथील असून ते पुणे रिटर्न आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात
आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - ११६
एकूण बरे झालेले रुग्ण - ५६
उपचार घेत असलेले रुग्ण -५७
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ३
Subscribe to:
Comments (Atom)










