Monday, 11 May 2020

ग्रीक झोन उस्मानाबाद मध्ये आढळला कोरोना पाॅजिटीव रूग्ण

गालबोट : उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ३७ दिवसानंतर कोरोना बाधित एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे ग्रीन झोनला गालबोट लागले आहे. हा रुग्ण परंडा येथे सापडला असून, तो पिकप टेम्पो चालक आहे. 


हा पिकप टेम्पो चालक ३० वर्षाचा असून तो मागील काही दिवसापासून  परंडा येथून पुणे तसेच नवी मुंबई येथे जात होता. तो  पिकप टेम्पो मधून टरबूज तसेच अन्य फळांची वाहतूक करीत होता. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. त्याला उपचारासाठी परंडा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

हा पिकप टेम्पो चालक आजपर्यंत कुणाकुणाच्या संपर्कात आला, याची शोध मोहीम सुरु झाली आहे. तसेच कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यामुळे परंडा शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद जिल्हा रविवार पर्यंत ग्रीन झोन मध्ये होता. मागील एक महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे नागिरकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी सर्व व्यवहार सुरु करण्यास शनिवारी परवानगी दिली. त्यानुसार आज सर्व व्यवहार सुरु झाले होते तसेच  एसटी बस सेवा देखील सुरु झाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी तीन कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले होते, परंतु ते पूर्णपणे बरे झाले होते. त्यानंतर ३७ दिवसानंतर कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एंट्री केली आहे. त्यामुळे ग्रीन झोनला गालबोट लागले आहे.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्फत 9 व्यक्तींच्या स्वाबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

Saturday, 25 April 2020

शकुनीची गोष्ट

*शकुनीची गोष्ट*


शकुनीचं वास्तव काय आहे?

गांधार देश व गांधारी याबद्दलची माहिती ही अत्यंत अल्प अशी माहिती आहे आपल्याला..महाभारत, कुरु व यदु कुल यांच्या प्रभावळीत गांधार देश हरवल्यासारखा आहे..

गांधार देश, गांधारी, शकुनी हा एक स्वतंत्र विषय होईल, एक मोठं पर्व, गांधार पर्व होईल एवढा इतिहास या गांधार देशाला महाभारतात आहे.परंतु, आपल्यापर्यंत केवळ गांधारी, तिचं अंध पतीला स्वीकारुन स्वतःचे नेत्र एका पट्टीनं बंद करणं व शकुनीचं कारस्थान एवढंच आलंय..

गांधार देश, आत्ताचा अफगाणिस्थान..राजा सुबल, यांना शकुनीसह एकूण शंभर पुत्र व गांधारीसह एकूण दहा कन्या होत्या..

गांधारी हे तिचं मूळ नाव नव्हे..गांधारीचं मूळ नाव शुभा हे होतं..जे गांधार देशावरुन नंतर गांधारी हे पडलं..शकुनीचं नाव सौबल..

शकुनि हा अत्यंत खलप्रवृत्तीचा असा..सर्वच बहिणींमध्ये शुभा ही अत्यंत लावण्यवती अशी..

तिला कायमच छळण्यात अग्रेसर असा शकुनी..

काल भीष्मांना कोणतं रहस्य समजलं होतं?

अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं, ते अचंबित करणारं होतं. 

गांधारीच्या जन्म पत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्यूचा योग होता. यावर उपाय म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा, असं राजज्योतिषानं सुचवलं. 

अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरू कुलात कोणालाही देण्यात आली नाही..

हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. बोकडाशी लग्न लावून देऊन त्याचा बळी दिल्यानंतर आणलेली कुलवधू ही एक अर्थानं विधवा ( हे पितामहांचे त्यावेळचे विचार असावेत, आत्यंतिक संतापापोटी आलेले) अशी, हे उद्या जगाला समजलं तर सगळीकडं आपली छी थू होईल या संतापानं त्यांच्या मस्तकात विचारांच्या ठिणग्या पडू लागल्या..

त्यांनी विचार केला की मी समस्त सुबल कुटुंबाचा उच्छेद केला तर हे गुपित कोणाला कधीच समजणार नाही हा उद्देश..

त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्विकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं..

फसवणुकीनं संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि सर्व भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्यांना तळघरात डांबलं. गांधारीनं खूप विनवण्या केल्या, पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला.

बंदिखान्यात असणार्‍या सुबलाला. त्याच्या पुत्रांना भोजन म्हणून दररोज केवळ एक मूठ्भर भात दिला जात असे..या कृतीमागं असणारा भीष्मांचा उद्देश सुबलाच्या लक्षात आला..

तो आपल्या पुत्रांना म्हणाला, ‘एखाद्या कुटुंबाची हत्या करणं म्हणजे अधर्म हे धर्मज्ञ असणार्‍या भीष्माला माहिती आहे. तेव्हा धर्मानं घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग न करता आपल्या सर्वांना मारुन टाकण्याचा हा मार्ग भीष्मांनी शोधून काढलाय..भीष्म आपल्याला रोज  अन्न देतात हे खरं असलं तरीही आपल्याला दिलं जाणारं अन्न इतकं अल्प असतं की, आपली उपासमार होते..अन शेवटी आपण सर्व उपासमारीनंच मरणार आहोत हे नक्की.या परिस्थितीतून आपण काहीही मार्ग काढू शकत नाही.

आपण भीष्मांकडं जे अन्न देताय, त्यापेक्षा जास्त अन्‍न द्या हे सांगणां म्हणजे भीक मागण्यासारखं आहे..यापेक्षा अपमानाची गोष्ट दुसरी कोणतीही नसेल..
त्यापेक्षा उपासमारीनं मरण आलेलं पत्करलं..
तसंच पलायन करणं हेही अनुचित, क्षात्रधर्माला अनुसरुन नाही..'

काळ उलटत गेला..कारावासात असलेल्या सुबल व सुबलपुत्रांची शारीरिक अवस्था खालावत गेली..

अन त्यावरुन सुरु झाले भांडणतंटे..

जगभरात व इतिहासात जेवढी म्हणून युद्धं झाली आहेत ती,जमीन, धनसंपत्ती, स्त्री व उपासमार..अन्नासाठी.

तेच झालं मिळणार्‍या मूठभर अन्नासाठी सर्वांमध्ये भांडणं सुरु झाली..
क्षुधा व्याकुळ व क्षीण अशा सुबलानं या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या पुत्रांपुढं एक विचार मांडला..

सुबल म्हणाला, ‘ आपल्यापैकी जो कोणी सर्वाधिक बुद्धिमान असणार्‍यानं एकट्यानंच हा भात खाऊन दिवस कंठावेत..
मात्र, एका अटीवर..
त्यानं आपल्यावर झालेल्या या अन्यायाला कधीही विसरता कामा नये..इतकंच नव्हे तर, त्यानं भीष्मांचा सूड घेण्यासाठीच फक्त जीवित राहावं..
जीवनाचं अंतिम ध्येय केवळ हेच राहिल..'

सुबलाची ही योजना त्याच्या पुत्रांना मान्य झाली..सर्वांनीच टाचा घासून मरण्यापेक्षा एकानं कोणी जीवित राहून हा सूड घ्यावा ही योजना सर्वांनाच पटली.त्यानुसार सर्वात तरुण अशा सौबल उर्फ शकुनी या सुबलाच्या पुत्राची निवड झाली..दिलं जाणारं सर्व अन्न शकुनि एकटाच खाऊ लागला..अन कालांतरानं सुबल कुटुंबातील इतर सदस्य हे उपासमारीमुळं तडफडून मेले.. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीनं विलाप केला, पितामहांची करूणा भाकली. पण ते द्रवले नाहीत. होता-होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला.

परंतु प्राण सोडण्यापूर्वी सुबलानं, शकुनीला बोलावून जवळ असणार्‍या लोखंडाच्या दंडाचा आघात त्याच्या पायावर केला..साहजिकच शकुनीच्या घोट्याचं हाड मोडलं..शकुनिच्या मोडलेल्या घोट्याकडं बघून सुबल त्याला म्हणाला,

'माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील. पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे, हे लक्षात असू देत.
तू आता आयुष्यभर लंगडत चालशील..अन प्रत्येक पाऊल टाकताना तू कुरुंनी आपल्या कुटुंबावर केलेल्या अन्यायाची आठवण ठेवशील..त्यांनी केलेल्या अपराधांची आठवण ठेवून त्यांना तू कधीही क्षमाही करु नकोस..

तुझा हा मोडलेला पाय, प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील...'

थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला. 

शकुनीला असणारी द्यूताची आत्यंतिक आवड ही सर्वांना माहिती होती..लहानपणापासून द्यूतक्रीडा व त्यातून लोकांना लुबाडणं हे सर्वश्रुत होतंच..

त्याच आवडीचा आधार घेत, सुबल त्याला म्हणाला, ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या बोटांच्या हाडांपासून तू द्यूतात वापरले जाणारे फासे घडव..या बोटांच्या हाडांमध्ये कुरुकुलाबद्दल मला असलेला सारा संताप व क्लेश उतरले आहेत.अन एवढंच नव्हे तर, हे फासे तुझ्या हुकुमाचे ताबेदार असतील..तुला हवं असणारं दान प्रत्येक वेळी पडत जाईल..
परिणामी, या फाशांच्या साहाय्यानं तू द्यूताचा प्रत्येक डाव जिंकत जाशील..'

भावांच्या मृत्यूंनंतर पित्याच्याही मृत्युनं गांधारी कोसळली. शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीनं मरू द्या, असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली. 

पितामहांना तोवर आपल्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबाबत संदेह वाटू लागला होता. त्यांनी शकुनीला अभय दिलं... शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला...
भीष्मांनी इतर मुलांबरोबरच त्याचं पालनपोषणही केलं..

शकुनि आपणा कुरुकुलाचं हित चिंतणारे आहोत हे दर्शवत राहिला...
पणा भीष्माच्या आधिपत्याखाली वाढणार्‍या या कुळाचा सत्यानाश कसा घडवता येईल हा विचार सतत त्याच्या मनात राहिला..अन त्या दिशेनं त्याची पावलं चालत राहिली.. आणि पुढं सर्वज्ञात महाभारत घडलं...

गांधारीच्या मनातही कमी गाठी नव्हत्या..तिच्या संपूर्ण कुटुंबाची भीष्मांनी केलेली वाताहत कायमच धगधगत राहिली.

कुंती नंतर माद्री यांचे विवाह झाले..

तिन्ही विवाहांच्या तर्‍हा वेगळ्या..तिचा विवाह ज्या तर्‍हेनं झाला त्याबद्दल तिच्या मनी एक खंतही होती..आपणा या कुलात सम्राज्ञी म्हणून आलो असलो तरीही आपला विवाह साधेपणानं झाला व खटकणारी गोष्ट म्हणजे विवाहाचा सर्व खर्च तिच्या पित्याला करावा लागला होता..म्हणजे सुबल कुल योग्यतेचं नव्हतं का?
मानभंगाचं शल्य कायमच तिच्या मनात राहिलं..

शकुनीनं कौरव-पांडवांमध्ये कलह माजवला, जो की दोन्ही परिवारांना फक्त विनाशाकडे घेऊन गेला..

#शकुनी_काय_आहे?

शकुनी ही मूर्तिमंत खलप्रवृत्ती आहे...नकारात्मकता आहे..
चांगलं न बघवण्याची ही वृत्ती..

गांधारीच्याच एका आत्मकथनात, गांधारी लहान असतानाच शकुनीनं तिला कमळांच्या पुष्करिणीत ढकलून दिलं अन तिला वाचवायला जाणार्‍य बहिणींना त्यानं घाबरवलं, तुम्ही गेलात तर शुभा तुम्हालाही आत ओढेल..

घाबरवणं, भीती घालून न घडणार्‍या गोष्टीही मनात ठसवू पाहणार्‍या या वृत्तीचा जनक शकुनी असावा..

#धृतराष्ट्र...सतत आपल्या अंधपणाचा गंड बाळगून त्याबद्दल सहानुभूती मिळवण्यासाठी आक्रंदणारा..

सतत परिस्थितीला दोष देत रडत राहण्याची वृत्ती म्हणाजे धृतराष्ट्र..

महाभारतातली ही पात्रं, एकेक वृत्तीची उदाहरणं आहेत.

कुरुकुलाला संपवण्यासाठी कारणीभूत असणार्‍यात, भीष्म सर्वात आधी..

समस्त कुरुकुलाच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं ते कुरुकुलच..

त्यातली प्रत्येक व्यक्ती..

शांतनुपासून ते शकुनीपर्यंत,अश्वत्थाम्यापर्यंत.
भीष्मही यातून सुटलेले नाहीत..

न विचार करता केलेली प्रतिज्ञा, त्याचा परिणाम किती भयंकर होऊ शकतो हा विचार न करता ती केली..

माणसाला असणारा मोह, किंवा माणसाचा ह्व्यास हा व हाच त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो, हा महाभारताचा सारांश आहे..

कुरुकुल म्हणाजे मानवी जीवन..अन ही सर्व त्यातल्या चांगल्या वाईट वृत्ती..

बारकाईनं विचार केला तर महाभारतात सारे प्रसंग, साऱ्या घटना, साऱ्या कथा या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या , सर्व भावभावनांना स्थान देणाऱ्या आहेत. 

महाभारतातही शृंगारापासून शांतरसापर्यंत साऱ्या रसांचा आविष्कार सहजपणे घडताना दिसतो. 


#तळटीप:-

कालपासून द्यूतक्रीडेचे भाग दूरदर्शनवर दाखवत आहेत..

त्यात एक प्रसंग असा आहे, शकुनी ही माझी सेना आहे, दुर्योधन.
पण ती तुझ्याकडे असू देत.
द्यूतक्रीडेच्या वेळी मला दे'

जेव्हा शकुनी माझ्या वतीनं फासे टाकेल हे दुर्योधंन म्हणतो तेव्हा विदुर काय म्हणतात बघितलंय का?

विदुर म्हणतात, द्यूत दुर्योधनाकडच्या फाशांनी होईल..

अन इथं शकुनीचा डाव बरोबर लागू पडतो.
विदुरांना जो संशय असतो,शकुनीच्या चलाखीचा तो बरोबर असतो...

पण शकुनी चलाखी करतोच..
त्याचे फासे दुर्योधनाकडे दिलेले असतात,जे विदुरांना माहिती नसतं.
तेच,सुबलाच्या अस्थीपासून केलेले.

Sunday, 19 April 2020

संधीवात व आयुर्वेद

*संधिवात व आयुर्वेद*
संधिवात बरेच गैरसमज आहेत ,काहींना वाटते तो बराच होत नाही पण आपल्याला बऱ्याच वेळा संधिवात म्हणजे काय हेच माहिती नसते
संधिवात म्हणजे काय ?
*संधी म्हणजे काय ? व त्याठिकाणी काय काय रचना असतात ? ज्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी वेदना होत असतात .

*संधीच्या ठिकाणी असणाऱ्या संरचना*
# त्वचा ,(Skin )
# मांसपेशी ,( muscle )
# स्नायू ,( Tendon )
# हाडे ,( Bones )
# लिगामेंट ,( Ligament )
# सांध्यांच्या मध्ये असणारे वंगण ,( Synovial Fluid )
# दोन्ही सांधे एकमेकांना घासू नये म्हणून कुर्चा ( Cartilage )
# शुद्ध रक्तवाहिन्या ( Artery )
# अशुद्ध रक्तवाहिन्या (Veins )
# संवेदना नसा ( Nerve )
# रसवाहिन्या ( lymphatic Vessel )

प्रथम आपल्याला ज्या *वेदना होत आहे त्याचे मुख्य कारण* काय आहे हे शोधने गरजेचे आहे त्यानंतर त्यावर उपचार करणे .

बऱ्याच वेळा आपण ते कारण न शोधता मनाने किंवा कोणाच्या सांगण्यावरून ,जाहिरातीतून औषधे घेतो व वेळ ,पैसा ,तसेच त्या औषधाच्या दुष्परिणामाला बळी  पडतो ,

आयुर्वेद शास्त्र सांध्याच्या ठिकाणी वेदना होण्याच्या कारणांमध्ये २ कारणे विशेषताने सांगते

*१) त्या अवयवाचे व्यवस्थित पोषण न होणे* व
*२) त्या सांध्याच्या पोषणाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होणे* .

१) *अवयवाचे व्यवस्थित पोषण न होणे* म्हणजे सांध्याचे पोषण होण्यासाठी वर दिलेल्या सर्व संरचनांचे पोषण होणे गरजेचे आहे .

जसे ( त्वचा ,(Skin )मांसपेशी ,( muscle )स्नायू ,( Tendon )हाडे ,( Bones )लिगामेंट ,( Ligament )सांध्यांच्या मध्ये असणारे वंगण ,( Synovial Fluid )दोन्ही सांधे एकमेकांना घासू नये म्हणून कुर्चा ( Cartilage )शुद्ध रक्तवाहिन्या ( Artery )अशुद्ध रक्तवाहिन्या (Veins )संवेदना नसा ( Nerve ) रसवाहिन्या ( lymphatic Vessel ) ,यांचे पोषण होण्यासाठी योग्य आहार घटकांची गरज आहे .

जसे
# *त्वचा* ( Skin) - हळद, काळे मनुके,तूप,मध,डाळिंब,आवळा,लोणी,पिकलेला आंबा ,लसूण
# *मांसपेशी* ( Muscles ) - गहू,बदाम,उडीद,आंबा,गाजर, मांस,तीळ,लाल भोपळा,कोहळा, तुपातील खजूर
# *अस्थी* ( Bones ) - शेवगा,जोडगहू लापशी, डिंक,जुने कच्चे तांदूळ पीठ (सुश्रुत),आहळीव, गव्हाचे सत्त्व, (चिक),दूध +तूप,लसूण(सुश्रुत)
शिंगड्याची खीर,शेवया खीर,अहळीव खिर
# *लिगामेंट* ( Ligament )  - उडीद  , स्नायू बंध ( बोकडाच्या संधींचे ) , पायासुप,चारोळी,रव्याचा शिरा,कोवळा ,मुळा,कोहळा पाक,हिरवा मूंग,उडीद वडे, शिरा
# *वंगण*- बदाम तेल,तीळ  तेल,एरंडेल,तूप ,शेंगदाणा तैल ,जवस तैल ,करडई तैल ,अक्रोड तैल ,खोबरेल तैल ,तैल बिया : तीळ ,जवस ,करडई ,शेंगदाणा. बदाम ,अक्रोड ,खोबरे ,दूध ,लोणी ,वसा ( प्राण्यांचे फॅट ) ,मज्जा ( प्राण्यांची मज्जा )
# *कुर्चा*- काळे तील कल्क,सर्व प्रकारचे हलवे (भोपळा,कोहळा,गाजर,) ,वसा ( प्राण्यांचे फॅट ) ,मज्जा ( प्राण्यांची मज्जा )
# *शुद्ध नी अशुद्ध रक्तवाहिन्या* - तांदूळ पेज +जिरे,खजूर+जिरे+गुळ,डोंगरी मोर आवळा ,अंजीर, काळे मनुके, ओली हळद,डाळिंब,कोकम, चटणी,राजगिरा लाडू,
# *नसा* ( Nerve )  - पिस्ता ,तीळ ,अक्रोड ,खोबरे+गुळं,फणस बीज,लोणी,दूध+तूप,कुष्मांड पाक ,कोहळा ,पेठा ,पाया सूप ,
# *रसवाहिन्या* ( Lymphatic system ) - खाण्याचे (नागवेल)पत्र,लवंग,विलायची, बडिशेफ,मिरे,ओवा(एकंदरीत लाळ उत्पन्न करणारी सर्व मसाला द्रव्य )increases lymphatic system drain by increasing metabolism

वरील सर्व पदार्थ हे पोषणासाठी गरजेचे असतात हे जर *आहारात योग्य प्रमाणात नसतील तर शरीराचे पर्यायाने सांध्यांच्या ठिकाणी योग्य पोषण होत नाही* व शरीराची झीज होण्यास सुरवात होते व संधिवेदना सुरु होतात .
हे सर्व पौष्टिक खाऊनही वेदना होत असतील तर त्याचे दुसरे कारण म्हणजे पोषण मार्गात अडथळा तो पुढील लेखात
क्रमश : 


शाळा बंद. ...पण शिक्षण आहे.

[14/04 09:39] Rameshwar Jagdale: [14/04 08:42] Sanjiv Bagal: दि.१४ एप्रिल २०२०, मंगळवार

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - २)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्या आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं चालू असेलच! आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे.
     म्हणूनच  या लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही यापुढील काळात रोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या सुचनेतील विषयनिहाय पाठनिहाय लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे.

चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!


*आजचा विषय-गणित*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-आठवड्याचे वार*
https://bit.ly/3a8xW5O


*इयत्ता-दुसरी*
*पाठ-पाढे तयार करू या*
https://bit.ly/2VgHo1q

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-दिनदर्शिका*
https://bit.ly/2yadbZS

*इयत्ता-चौथी*
*पाठ-आकृतिबंध
https://bit.ly/2RwtDKP


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-परिमिती*
https://bit.ly/3a8xJ2w

*इयत्ता-सहावी*
*पाठ-भौमितिक रचना*
https://bit.ly/2RLKYjl

*इयत्ता-सातवी*
*पाठ-सांख्यिकी-स्तंभालेख*
https://bit.ly/34whnPG

*इयत्ता-आठवी*
*पाठ-क्षेत्रफळ*
https://bit.ly/2ybeeJm

*इयत्ता-नववी*
*पाठ-पृष्ठफळ व घनफळ*
https://bit.ly/3caP4cf


 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[14/04 08:42] Sanjiv Bagal: 👆👆👆👆👆👆👆👆👆👆

*महत्वाचे*

*सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना , शिक्षकांना व पालकांना अभ्यासमालेचा मेसेज रोज मिळेल यासाठी आपल्या अधिनस्थ सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत आवश्यक नियोजन करावे. माझ्या शिक्षक मित्रांनी देखील जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांच्यापर्यंत सदर मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करावी.*

*राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना या कालावधीत उत्तम व दर्जेदार ई साहित्य देण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करुया.*


आपला
दिनकर पाटील
शिक्षण संचालक,
महाराष्ट्र राज्य, पुणे

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ३)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्या आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं चालू असेलच! आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे.
     म्हणूनच  या लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही यापुढील काळात रोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या सुचनेतील विषयनिहाय पाठनिहाय लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे.

चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!


*आजचा विषय-इंग्रजी*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-The fox and the crane*
https://bit.ly/3caFjea

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-Who is better?*
https://bit.ly/2K0kaY8

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-Find a friend!*
https://bit.ly/2XxTpCk

*इयत्ता-चौथी*
*पाठ-Never-ending story*
https://bit.ly/34wVq3h

*इयत्ता-पाचवी*
*पाठ-Dice for your game*
https://bit.ly/2yZ2v0M

*इयत्ता-सहावी*
*पाठ-A fantastic shop*
https://bit.ly/34KBHNL

*इयत्ता-सातवी*
*पाठ-Baby pangolin's out night*
https://bit.ly/2yZNHir

*इयत्ता-आठवी*
*पाठ-P.V.Sindhu: An icon of success*
https://bit.ly/2V56gKw

*इयत्ता-नववी*
*पाठ-The tempest*
https://bit.ly/2yigHRZ

यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम्ही एक विशेष प्रश्नमंजुषा देत आहोत.खालील लिंकवर जाऊन ही प्रश्नमंजुषा आपण सर्वांनी सोडवावी.*
https://bit.ly/2V9eRvT


*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[16/04 09:36] Rameshwar Jagdale: दि.१६ एप्रिल २०२०, गुरूवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ४)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

*आजचा विषय-परिसर अभ्यास-१/विज्ञान*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-सुशिलाच्या रांगोळ्या*
https://bit.ly/2K5rUrT


*इयत्ता-दुसरी*
*पाठ-स्वरांची ओळख*
https://bit.ly/3epYrXJ

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-पाणी नक्की येते कुठून?*
https://bit.ly/2yd4YEq

*इयत्ता-चौथी*
*पाठ-अन्नपदार्थातील विविधता व पौष्टिकता*
https://bit.ly/3eni2HY


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-पर्यावरण आणि आपण*
https://bit.ly/2RE86zT

*इयत्ता-सहावी*
*पाठ-प्रकाश व छायानिर्मिती*
https://bit.ly/3en8eh5

*इयत्ता-सातवी*
*पाठ-चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म*
https://bit.ly/2Vu7vSB

*इयत्ता-आठवी*
*पाठ-मानवनिर्मित पदार्थ*
https://bit.ly/2RGUDrj

*इयत्ता-नववी*
*पाठ-अनुवंशिकता व परिवर्तन*
https://bit.ly/2yjyEQ5

*इयत्ता-दहावी*
*पाठ-अवकाश मोहिमा*
https://bit.ly/3bbSk7i

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[17/04 12:45] Rameshwar Jagdale: दि.१७एप्रिल २०२०, शुक्रवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ५)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

*आजचा विषय-परिसर अभ्यास-२/इतिहास-नागरिकशास्त्र/राज्यशास्त्र*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-प्राण्यांची ओळख*
https://bit.ly/2RI8WMm

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-गरजाधिष्ठित उपक्रम*
https://bit.ly/34FbZtT

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-आपल्या गरजा कोण पुरवतात?*
https://bit.ly/2XEYXel

*इयत्ता-चौथी*
*पाठ-गड आला पण सिंह गेला*
https://bit.ly/3afwzCj


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती*
https://bit.ly/2VegJ6y

*इयत्ता-सहावी*
*पाठ-दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये*
https://bit.ly/3beCfxH

*इयत्ता-सातवी*
*पाठ-संविधानाची उद्देशिका*
https://bit.ly/34DCUpW

*इयत्ता-आठवी*
*पाठ-महाराष्ट्र राज्याची निर्मिती*
https://bit.ly/2RJRtTx

*इयत्ता-नववी*
*पाठ-महायुध्दोत्तर राजकीय घडामोडी*
https://bit.ly/34GKJep

*इयत्ता-दहावी*
*पाठ-संविधानाची वाटचाल*
https://bit.ly/3aexJxC

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[18/04 18:36] Rameshwar Jagdale: दि.१८एप्रिल २०२०, शनिवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ६)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

*आजचा विषय-परिसर अभ्यास-१/भूगोल*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-विविध हालचाली व शारीरिक स्थिती*
https://bit.ly/3evKrvh

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-व्यायाम*
https://bit.ly/3ae2S4A

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-सुंदर दात,स्वच्छ शरीर*
https://bit.ly/2Vh6Q80

*इयत्ता-चौथी*
*पाठ-हवा*
https://bit.ly/3cqYnFk


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-सामाजिक आरोग्य*
https://bit.ly/2xtP6xs

*इयत्ता-सहावी*
*पाठ-नैसर्गिक संसाधने*
https://bit.ly/3bjn8TB

*इयत्ता-सातवी*
*पाठ-भरती-ओहोटी*
https://bit.ly/2wKv4y7

*इयत्ता-आठवी*
*पाठ-स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
https://bit.ly/3adimFP

*इयत्ता-नववी*
*पाठ-वाहतूक व संदेशवहन*
https://bit.ly/3bfYljb

*इयत्ता-दहावी*
*पाठ-पर्यटन,वाहतूक व संदेशवहन*
https://bit.ly/2K9oRio

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*उद्या दिनांक १९ एप्रिल 2020, रविवार रोजी या आठवड्यात पुरवण्यात आलेल्या ई-कंटेंटवर आधारित प्रश्नमंजुषा देण्यात येणार आहे.*

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*

Wednesday, 3 April 2019

Jobs IN Pune

पदाचे नाव: अँड्रॉइड डेव्हलपर
कंपनीचे नाव:सॉफ्टफ्लम सोल्यूशन्स प्रा. लि टेक्नोलॉजीज प्रा. लिमिटेड
अनुभवः 1+ वर्षे
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी
info@softflame.in

https://t.co/kAOSHju5Bv


Friday, 22 March 2019

तुकाराम महाराज #तुकाराम_#तुकाराम_बीज

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पशुपक्ष्यांशी सोयरिक जोडणारे हे संतकवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात देहूच्या डोंगरावर जात असत. तेव्हा ते त्या डोंगरावरील झाडांशी व पशुपक्ष्यांशी एवढा तादात्म्य पावत की ते वृक्षवेली पशुपक्षी हे बंधू सखा भगिनी, माता पिता सखी वाटत असत. त्यांच्याशी ते मग आपल्या मनातील सुखदु:ख व्यक्त करीत असत आणि मग निसर्गाच्या सहवासात त्यांना एकांतवासात जे परमसुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत असत. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन त्यांना साथ देत असत, त्यात ते इतके तल्लीन होत की सारी संसाराची दु:खे विसरत असे.
वृक्षवल्ली हे आपलेच, कुटुंबीय आहेत असे मानणारे तुकारामासारखे इतरही संतकवी आपल्याला संत साहित्यात भेटतात. संत सावता माळी तर शेतात आलेल्या फळभाज्यांना आपले दैवत मानीत.
‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणून निसर्गावर प्रेम करीतच त्यांनी आपला भक्तीचा मळा फुलविला होता. तर बाह्यरंगापेक्षा अंतरंग पाहा हे सांगणा-या चोखोबांनी :
‘ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा
काय भुललासि वरलिया रंगा’’ हे सांगून भक्ती रसात उसाचा गोडवा आणला. तव वृक्षवल्लींची उपमा देताना ‘‘मराठीचि वेलू गेला गगनावरी’ सांगताना त्यांनी निसर्गाशी नेहमीच जवळीक केली आहे. रामदासांचं तर इतकं बारीक निरीक्षण होतं की त्यांनी दासबोधामध्ये औषधी झाडांची यादीच दिली आहे. पशुपक्ष्यांसंबंधीचा संदर्भ देताना मुंगी उडाली आकाशी
तिने गिळीले सूर्याशी’ हे आगळे आध्यात्म सांगितले आहे. तर आईच्या प्रेमाचा महिमा सांगताना ‘‘घार उडते आकाशी। चित्त तिचे पिलापाशी’’ असं उदाहरण दिले आहे. आधुनिक मराठीत ख-या अर्थाने निसर्गाशी समरस झालेले एकमेव कवी म्हणजे बालकवी. त्यांनी सारा निसर्गच आपल्या कवितेत आणला. ते नुसते उपमा देत बसले नाहीत, तर निसर्गाच्या भाषेतूनच ते बोलत असत. मराठीत अनेकांनी निसर्ग कविता लिहिल्या आहेत. पण निसर्गाशी ख-या अर्थाने फक्त बालकवीच समरस झाले. त्यावेळी पर्यावरणाचा दिवस साजरा होत नसे किंवा झाडे लावा ही मोहीमही नसे. पण गावी आपल्या शेतात काम करताना शेतकरी एक तरी झाड लावीत असे, बांधावर झाड लावणे हा त्यांच्या शेतीचाच एक भाग होता.
खरं तर आपणा सगळ्यांनाच निसर्गाची आवड आहे. परंतु आपण आळस करतो आणि आपण दूरच्या नातेवाइकांना जसे विसरतो तसे निसर्गालाही विसरतो. पर्यटनामुळे हल्ली आम्ही वनसहली काढू लागलो आहोत, परंतु तेथे निसर्गाशी जवळीक साधण्यापेक्षा फक्त मौजमजा केली जाते. त्यामुळे उलट निसर्गाला त्रास होऊ लागला असून जंगलात कचरा आणि बाटल्यांचा खच पडू लागला.. निसर्गापासून काही न शिकता आपण त्यापासून केवळ आनंदाची अपेक्षा करतो.
झाडाचे संवर्धन हे ३६५ दिवस करणे हे खरे पर्यावरण! खरे पर्यावरण म्हणजे शहरातून जंगलात जाणे नव्हे तर जंगलाला आपल्या शहरात आणणे हे महत्त्वाचे आहे. केवळ एक दिवस रोप लावणे म्हणजे पर्यावरण दिन संपत नाही. आपल्या घराच्या अंगणात किंवा परसात दरवर्षी एकतरी झाड लावणे आणि ते वाढविणे म्हणजे पर्यावरण आयुष्यात पाळणे, एक झाड तोडले तर दोन झाडे लावा हा नियम आपण पाळत नाही. लहानपणी आम्ही शाळेत १५ ऑगस्टला झाडे लावीत असू. ती चळवळ आता पर्यावरण दिनात पाळली जात आहे. आता शाळेत गेलो तर हे झाड आपण लावले हे अभिमानाने सांगू शकतो. नुसते झाड लावणे महत्त्वाचे नाही त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून कविवर्य ग. दि. माडगुळकर म्हणतात,
हाती नाही बळ
दारी नाही आड
त्याने फुलझाड
लावू नये।।

Tuesday, 12 March 2019

Jobs in Pune

डायरेक्ट वॉक-इन
कला, विज्ञान आणि वाणिज्य आणि सर्व ग्रॅज्युएट्स केवळ 201 9 पास
कंपनीचे नाव: विप्रो
शिक्षण: बीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीकॉम, बीएससी, बीसीए, बीसीएम
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी
https://t.co/vDpJMyeoxU


Monday, 11 March 2019

Jobs in Pune

पदाचे नाव: अँप्लिकेशन अभियंता
कंपनीचे नाव: हनीवेल
ठिकाण:पुणे
शिक्षण: इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी
https://honeywell.csod.com/ats/careersite/JobDetails.aspx?id=184177&source=IND&site=1

स्थानः 56 आणि 57 हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे, एमएच 411013 IND

--सुवर्णसंधी (फक्त व्हाट्सअप) : +91 96076 98946--

Monday, 18 February 2019

कविता-रूद्रास आवाहन, कवि-भा.रा.तांबे

आपल्याला भा रा तांब्याची असलेली एक कविता शेअर करतोय. आजच्या परिस्थितीत किती योग्य आहे.

रुद्रास आवाहन

डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।

पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।

जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।

पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।

Friday, 15 February 2019

#pulwama terrorist attack

निशब्द झाल्या जाणिवा
थिजून गेले शब्द
याच नेत्रांनी पाहीले
माझ्या शुरांचे रक्त
असा आज खंत करत राहीलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

फडताळातील बंदूक
जर खोटी नसती
पहिली गोळी आज
मिच झाडली असती
लाहोरमधली होळी आज खेळून आलो असतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

 न जाऊ दिले असते
शुरांचे बलिदान व्यर्थ
असा घडवला असता
शिवबा शब्दाचा अर्थ
दुर्दैवाने आज विलाप करीत बसलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

प्रेमाची अनं त्यागाची फुले
आज अश्रूंची झाली
त्याच फुलांनी आज
 श्रद्धांजली वाहिली
मनातून आज चडफडत राहिलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो

शब्द आले थांबा सर , हरू नका
करू नका तुम्ही खंत
सिमेवर अजूनही लढतो आहे
तुमचा  विद्यार्थी शुर जातिवंत
फक्त एकच सैनिक घडला असता
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाला असता

 जशास तसे, शिकवन तुमची
आहे आमीच्या ठायी
बलिदान व्यर्थ   मित्रांचे
आम्ही जाऊच देणार नाही
आकाशातले हे तारे कसे घडले असते
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाले असते

उठलो मुला , जागा झालो
कळले आज मर्म
लाख पेटल्या जाणिवा जरी
माणवता हाच खरा धर्म
देशाची शकले करणाऱ्यांना तेजस्वी उत्तर देईन
इथून पुढे फक्त सैनिकच घडवत राहीन...

 *विनम्र श्रद्धांजली*
💐💐💐💐💐💐💐💐

Competitive exam स्पर्धा परीक्षा

*स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण - शब्दविचार -* १
30| Feb 15, 2019, 04.00 AM IST

*वैशाली कार्लेकर*

शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ......... मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून उतरलेले, पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेले आणि जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरसाज दिलेले हे अजरामर गीत तुम्हाला माहीत असेलच. व्याकरणातला शब्दविचार शिकतानाही याच गाण्यातील 'शब्दांच्या पलीकडले' ही ओळ आठवावी म्हणजे शब्दविचार कळून जाईल. कारण व्याकरणात प्रत्येक स्वतंत्र 'शब्दाच्या पलीकडे' जाऊन त्या शब्दाद्वारे वाक्यात कोणते कार्य घडले आहे, त्या संदर्भावर त्या शब्दाची जात (प्रकार) अवलंबून असते. थोडक्यात एक विशिष्ट शब्द म्हणजे त्याची नेहमी हीच विशिष्ट जात असेल असे गृहीत धरता येत नाही. यासाठी एक उदाहरण पाहू या.

१ दशरथाने कैकयीला दोन वर दिले. (नाम )

२. तू त्या राजपुत्राला वर. (क्रियापद)

3. पक्षी झाडावर बसतो. (शब्दयोगी अव्यय)

४. बाण खालून वर गेला. (क्रियाविशेषण)

या वाक्यांमध्ये 'वर' हा एकच शब्द वाक्यात विविध कार्ये करतो म्हणूनच त्याला वेगवेगळ्या शब्दजातींची नावे दिली आहेत. म्हणूनच शब्दाचा विचार करताना आपली ही मनोभूमिका तयार झाली की शब्दांच्या जाती समजणे सोपे जाते.

आता आपण सर्वप्रथम शब्दाची व्याकरणिक व्याख्या पाहूया.

शब्द - ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला, तर त्याला शब्द असे म्हणतात.

उदा. 'म, क, ळ' या तीन अक्षरांची 'कमळ' अशा क्रमाने रचना केली तर मराठी भाषेत त्याचा अर्थबोध होतो व त्यामुळे तो मराठी भाषेतला अर्थपूर्ण शब्द आहे असे म्हणता येते. मात्र मकळ, कळम अशा रचना मराठीत अर्थपूर्ण होत नसल्याने त्यांना शब्द म्हणता येणार नाहीत.

आता शब्दांच्या मुख्य आठ जाती पाहू या.

शब्दांच्या जाती

शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांच्या पुढीलप्रमाणे आठ जाती ठरतात.

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय

यातील पहिल्या चार जाती सव्यय किंवा विकारी आहेत, कारण त्यांच्यामध्ये बदल होतो, तर पुढील चार जाती अव्यय किंवा अविकारी आहेत. त्यांच्यामध्ये बदल होत नाहीत.

शब्दांच्या जातींच्या व्याख्या आणि उदाहरणे तुम्ही संदर्भ पुस्तकातून अभ्यासालच. इथे आपण त्यांच्याविषयी काही विशेष माहिती पाहूया.

नामांचे धर्मवाचक आणि धर्मिवाचक असे वर्गीकरण असून सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम असे तीन प्रकार आहेत.

नामाच्या मूळ प्रकारांचेही एकमेकांच्या जागी कार्य होते. तसेच इतर शब्दजातीही काहीवेळा नामरूपात येतात. उदा. मी आत्ताच नगरहून आलो. (नगर- मूळचे सामान्यनाम, येथे विशेषनाम ) शहाण्याला शब्दांचा मार ( शहाणा- मूळचे विशेषण, येथे सामान्यनाम)

लिंग, वचन आणि विभक्तीमुळे नामाच्या रुपात जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात.

मराठीत ३ लिंगे मानतात. निर्जीव वस्तूंची लिंगे काल्पनिक आहेत, त्यामागे काही बाबतीत तत्त्व आढळते, तर अनेक अपवाद आढळतात. त्यामुळे मराठी भाषा ऐकून आणि बोलण्यात तिचा वारंवार उपयोग करूनच ही लिंगव्यवस्था समजून घेता येते.

मराठीत २ वचने आहेत. वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते. जोडपे, त्रिकूट, ढीग, रास, समिती, सैन्य यातून अनेकत्व किंवा समूह दर्शविला गेला तरी तो एक गट मानून त्याचे एकवचन मानले जाते. मात्र २ किंवा त्याहून जास्त जोडपी, त्रिकुटे, ढीग असले तर अनेकवचनी मानली जातात.

सामान्यरूपे लक्षात येण्यासाठी त्या नामाचा वाक्यात उपयोग करून पाहावा. वर्ग या शब्दाचे सामान्यरूप 'वर्गा' आहे, वर्गात किंवा वर्गाला नव्हे. या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य (अनिश्चित) सर्वनाम यातील फरक - उदा. कोण रे तू? (प्रश्नार्थक सर्वनाम), तिकडे कोण आहे, ते मला माहीत नाही. (सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम)

आपण आणि स्वतः या ही पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम या दोन्ही प्रकारात आढळतात. त्यांच्यातील फरक लक्षात घेणे.

विशेषणांचे मुख्य प्रकार

अ) सिद्ध विशेषणे - १. गुणविशेषणे- मोठी मुले, २. संख्याविशेषणे -दहा मुली, ३. सार्वनामिक विशेषणे -माझे पुस्तक, ब) साधित विशेषणे - १. नामसाधित विशेषणे - सातारी पेढे, २. धातुसाधित विशेषणे - हसरी मुलगी, ३. अव्ययसाधित विशेषणे - वरचा मजला

क्रियापदाचा अभ्यास करताना धातू, धातुसाधिते, कर्ता, कर्म या सर्व संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणादाखल एकेक वाक्य लक्षात घेऊन सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध क्रियापदे लक्षात घेणे आवश्यक आहे. मो. रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकामध्ये क्रियापदविचाराची सविस्तर माहिती आहे.

काळांच्या उपप्रकारांमधील अपूर्ण काळ आणि रीतिकाळ यांच्यातील फरक नीट समजून घ्यावा. उदा. तो कविता म्हणत असेल -(भविष्यात क्रिया चालू असल्याचे दिसते -अपूर्ण भविष्यकाळ) तो कविता म्हणत राहील/जाईल. (भविष्यात क्रिया सतत करत राहण्याची रीत समजते - रीति भविष्यकाळ)

क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये आणि केवलप्रयोगी अव्यये या सर्व अव्ययप्रकारांचे त्यांच्या अर्थावरून व स्वरूपावरून विविध प्रकार आहेत. ते बारकाईने अभ्यासावेत.

अशाप्रकारे सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे शब्दांचे वाक्यातील कार्य समजून जात निश्चित केली तर शब्दविचार हा संपूर्ण घटक अभ्यासासाठी सोपा आहे. पुढील लेखामध्ये आपण समास, शब्दसिद्धी आणि शब्दशक्ती या घटकांची माहिती घेऊया.

Sunday, 27 January 2019

Fan dance पंखा कवायत

https://youtu.be/ogWUUNoYoAQ 
70व्या प्रजासत्ताक दिनाच्या* निमित्ताने *पंखा नृत्य* *fan drill* सादरीकरण

▪जिल्हा परिषद प्राथमिक शाळा *शेळका धानोरा* ता. कळंब जि. उस्मानाबाद

▪Video पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि *LIKE* & *SUBSCRIBE* करा.

Sunday, 20 January 2019

School competition शालेय स्पर्धा






जि.प.प्राथमिक शाळा *शेळका धानोरा* येथे *प्रजासत्ताक दिनानिमित्त* *संगीत खुर्ची, लिंबू चमचा, स्मरण शक्ती व रंगभरण स्पर्धा* घेण्यात आल्या.