Sunday, 28 June 2020
Saturday, 27 June 2020
कोरोना -उस्मानाबाद जिल्ह्यात आज आठ रूग्ण कोरोना पाॅजिटीव
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात तुळजापूर तालुक्यातील चार आणि दोन उस्मानाबाद आणि उमरगा आणि वाशी येथील प्रत्येकी एक असा समावेश आहे. आज २७ जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 64 स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते.
सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ पॉजिटीव्ह , चार inconclusive व 52 निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. दोन रुग्ण हंगरगा ता. तुळजापूर, एक रुग्ण सलगरा (दिवटी ) ता. तुळजापूर, येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण प्रॉपर तुळजापूर येथील आहे. असे एकूण चाररुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत. दोन रुग्ण एमआयडीसी , उस्मानाबाद येथील आहेत. एक रुग्ण बालाजी नगर, उमरगा येथील व एक रुग्ण वाशी येथील असून तो बाहेर देशातून आलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण - २०६
बरे झालेलं रुग्ण - १५९
मृत्यू - ९
ऍक्टिव्ह रुग्ण ३८
कुळीथ( हुलगे) आरोग्यासाठी फायदे
कुळीथ एक उत्तम ,पौष्टिक औषधी,धान्य आहे,पारंपारिक आयुर्वेदिक
पाकक्रुतीत कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणून वापरले जाते.कुळीथ
चवीला गोड,तुरट,व उष्ण असतात, पचायला हलके असतात,कुळिथ हे
प्रथिने व इतर पोषक घटकांचा संभाव्य स्रोत आहे,हे लोह, माॅलिब्डेनम व
कॅल्शिअमचे उत्तम स्रोत आहे.खरं तर स्थूल व्यक्तीसाठी हे फायद्याचे
कडधान्य आहे.यात सर्वात कमी चरबी व चोथा अधिक असल्याने याच्या
सेवनाने वेगाने वजन,मेद कमी होतो.काविळीत याचे भरपुर सेवन करावे.
सर्व प्रकारच्या युरिन,मूत्राशयाच्या विकारांवर कुळीथाचा काढा करून
पिण्यास द्यावा.लवकर गुण येतो.बाळंतिणीला दूध भरपूर येण्यासाठी
याचा काढा देतात, कुळीथ हे वातघ्न,कफघ्न आहे,याचे सार रोगी
माणसास पथ्यकार आहे.शरिराच्या कोणत्याही सूजेवर कुळीथाचा
उपयोग होतो.तीव्र ज्वर असल्यास कुळीथाचा गरम काढा,सूप रुग्णास
पिण्यास दिल्याने त्वरीत ताप उतरून त्याला हुशारी येते,कुळीथाचे पीठ
उटण्यासारखे शरिराला आंघोळीच्या वेळेस चोळले तर वेगाने चरबी कमी
होते.मुतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांसोबत कुळीथाचे सूप
द्यावे पोटात होणारी वेदना ( रीनल कोलिक) कमी होते.पोटात वात धरणे,
पोट दुखणे,फुगल्यासारखे वाटणे यावर याचा काढा उपयोगी आहे.
पोटातील जंत,कृमी सेवनाने नष्ट होतात.त्वचेची आग,पुरळ,फोड,याकरता
याचे चूर्ण पाण्यासोबत घ्यावे,चेहरा उजळण्याकरता, मुलायम,सुंदर
करण्याकरता याची पेस्ट करून लावावी.कुळीथ हे फेरूलिक,
क्लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टिअन,व माल्विडिन
वनस्पतीजन्य रसायनयुक्त आहे. त्यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना
अटकाव करते व वजन कमी करते.कुळीथाच्या नियमित सेवनाने
कोलेस्ट्रोलचे प्रमाण घटवून हार्ट अटॅक धोके टाळता येतात.यात फायबर
विपुल असल्याने बद्धकोष्ठ,मुळव्याध,बवासिर हे आजार होत नाही.
मधुमेहींनाही उपयोगा आहे,आयुर्वेदात कुळीथ डोळ्यांना हितकर
सांगितले आहे.कुळीथातले लोह शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण
वाढवते.वरिल सर्व फायदे लक्षात घेता,इतर धान्ये,व कडधान्ये आपण
नियमित खातो,तसेच कुळीथाला देखील प्राधान्य देऊन आपल्या
आहारात जागा द्यावी.जेणेकरून उत्तम स्वास्थ राहील.
टोन्सिल - लक्षण,कारण और उपाय
टोन्सिल ...
टोन्सिल (tonsils) हमारे शरीर में पहले से ही मौजूद होता है, यह हमारे जीभ के पीछे की भाग से सटा हुआ होता है | यह हमारे गले में जहा पर नाक का छिद्र तथा मुख का छिद्र मिलता है, ठीक वही पर जीभ के पिछले भाग से जुडा हुआ स्थित पाया जाता है | सामान्य अवस्था में टोन्सिल से किसी भी तरह का परेशानी नहीं होती है | परन्तु अगर किसी कारण वास इसमें संक्रमण हो जाये या इसमें सुजन आ जाये तो इससे काफी दर्द होता है | दर्द के कारण कभी कभी खाना खाने में एवं मुह को खुलने में काफी तकलीफ होने लगता है |
टोन्सिल के लक्षण / Tonsils ke lakshan
गले में खरास महसूस होना |
कंठ में तेज दर्द रहना |
कान के निचले भाग में भी दर्द रहता है |
दर्द के कारण बुखार भी रहता है |
शरीर में कमजोरी लगने लगती है |
टोन्सिल होने के कारण
ठण्ड मौसम के कारण |
ठंडी चीज के सेवन करने से |
किसी तरह के virus या becteria के कारण हमारे गले में संक्रमण होने से |
ice cream खाने या ठंडी शीतल पेय को पिने से |
शर्दी जुकाम के कारण भी टोन्सिल होने लगता है |
टोन्सिल का उपचार...
1) दूध, हल्दी, एवं गोलकी (milk, turmeric and papper mint powder) –
दूध हल्दी एवं गोलकी का मिश्रण बना कर पिने से बुखार गले का दर्द और सुजन कम होने लगता है | इसी वजह से इस मिश्रण का इस्तेमाल टोन्सिल होने पर किया जाता है | क्योकि टोन्सिल होने पर बुखार दर्द और सुजन होने लगता है |
एक ग्लास में गर्म दूध ले |
उस दूध में आधा चम्मच हल्दी का powder तथा आधा चम्मच गोलकी का powder को मिलाकर घोल दे |
रोजाना रात में सोने से पहले उस दूध को पिये
2) नीबूं और शहद ( lemon and honey ) – नीबूं और honey में नमक मिला कर सेवन करने से गले की सुजन भी कम होता है, साथ में गले का खरास भी दूर होता है |
एक ग्लास गर्म पानी ले |
उसमे एक नीबूं को काट कर उसके आधे भाग से रस को गर्म पानी में निचोड़ दे |
फिर उस गर्म पानी में 2 से 3 चम्मच शहद को मिला दे |
रोजाना दिन में तीन (3) बार उस घोल को एक सप्ताह तक सेवन करे |
3) गाजर (carrot) –
गाजर में कारोतें नाम की gradients होते है जिसके कारण गाजर का रंग लाल होता है | गाजर में पाए जाने वाले यह gradients antitoxicant होते है | गाजर के सेवन से गले में होने वाले संक्रमण से बचा जा सकता है | जो टोन्सिल (tonsil) होने से भी बचाता है |
2 से तीन गाजर को juice बना कर रोजाना दिन में तीन बार पिये |
3) चुकुन्दर (beet juice) –
beet में भी toxic agents पाए जाते है | जो virus तथा बेक्टेरिया से होने वाले संक्रमण से बचाता है |
beet का इस्तेमाल भी juice बनाकर किया जा सकता है |
4) गर्म पानी से गर्गिल (gargil with luke warm water) –
रोजाना सुबह उठ कर एक ग्लास हलके गर्म पानी में एक चम्मच नमक मिला कर गर्गिल करने से भी tonsil का सुजन कम होने लगता है |
》 क्या न करे (kya na kare)
अगर आपको tonsil हुआ हो तो कुछ बातो का खास ध्यान रखना काफी आवाश्यक हो जाता है, जैसे-
● दही , मलाई वाली दूध आदि का सेवन न करे |
मसालेदार खाना , तला हुआ चीजो को खाने से परहेज करे |
● अगर आपको tonsil की परेशानी है तो आप धुम्रपान न करे तो बेहतर होगा |
● किसी भी प्रकार की ठंडी चीजो का सेवन करने से बचने की कोशिस करनी चाहिए |
Friday, 26 June 2020
पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात कोणते आजार उद्भवू शकतात?
👉 योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते तसेच शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास देखील मदत होते.
पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवी आणि घामाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून आपले शरीर वाचू शकते. मात्र कमी पाण्यामुळे आपल्या शरीरात विविध आजार उद्भवू शकतात. त्याबाबत पाहुयात...
1) *पोटाची तक्रार* : कमी पाणी प्यायल्याने डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच अपचन, पोटात दुखणे असेही आजार होऊ शकतात.
2) *थकवा* : कमी पाण्यामुळे शरीराला थकवा येऊन शरीरातील एनर्जी कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच डोकेदुखी, ताण, गोंधळलेपणा, अस्वस्थता या सारख्या समस्या डोके वर काढू शकतात.
3) *हदयरोगाची समस्या* : शरीरात पाण्याच्या कमतरतेने डिहाड्रेशन होऊन शरीरातील रक्त गोठू शकते. ज्यामुळे रक्त प्रवाहामध्ये बाधा येवून हदयरोगाच्या तक्रारी निर्माण होवू शकतात.
4) *चेहऱ्यावरील समस्या* : चेहऱ्यावरील सुंदरता ही पाण्याच्या मात्रेवर टिकून असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. याने चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.
5) *लठ्ठपणाची समस्या* : पाणी कमी प्यायल्याने आपल्या शरीराचे वजन वाढून लठ्ठपणाचे विकार होऊ शकतात.
*टीप* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.
बहुगुणी उंबर (औदुंबर )
उंबर..( औदुंबर )
.... उंबर जिथे आहे तिथे श्री. दत्तगुरूंचा वास असतो.
असे हिंदू धर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच
उंबराच्या वृक्षाला अध्यात्मिक महत्त्व आहे...
तेव्हा हा वृक्ष आपल्याला अमाप अशी निसर्गदत्त औषध
योजना बहाल करतो...... उंबराच्या सालीचा काढा
करून त्यात वेलची, खडीसाखर टाकून सरबत करावे.
कँसर सारख्या रूग्णाच्या अंगाचा जो दाह होतो त्यावर
आराम पडतो.दिवसातून तिनदा घ्यावे औंदुबरावलेह हे
प्रसिध्द औषध पित्तज विकारांवर प्रसिद्ध आहे.जखम
झाल्यास, याच काढ्याने धुतल्यास ती वेगाने बरी होते.
अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा
घ्यावा.गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रदर,
श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल तर सालीचा
काढा पोटातून देतात.गर्भपात होउ नये म्हणून,गर्भाचे
नीट पोषण व्हावे म्हणून, याच्या सालीचा काढा
घेतात.उचकीवर उंबराच्या फळाचा रस घेतल्यास
थांबते.भस्मक नावाचा रोग आहे. त्यात सारखी भूक
लागते. पोट भरल्याची जाणिव होत नाही. तेव्हा
उंबराची साल दुधात घोटून द्यावी.काविळीत उंबराचे
पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.ज्वरदाह, तीव्र
तापात, पिकलेले उंबर द्यावे.गोवर,कांजण्या, अतिसार,
उन्हाळी, मधुमेह या सर्व रोगांवर उंबराचे फळ,पाने,फूले
उपयोगात आणली जातात.किटकदंश, विंचूदंश
झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास दाह, वेदना
कमी होतात.तोंडातले अल्सर , व्रण, छाले, यावर
उंबराच्या पानावर असे बुडबूडे( मोख) वर दिसतात. ते
काढून त्याची चटणी मधातून चाटण म्हणून द्यावे.
तोंडाचा दाह कमी होतो.अंगात उष्णता, कडकी
असल्यास उंबराची दोन फळे रोज खावीत
खडिसाखरेसोबत.. निघून जाते.तृष्णेचा आजार बरा
होतो.जेव्हा खूप तहान- तहान होते,जीव कासावीस
होतो.तेव्हा उंबराची साल वा कच्ची फळे पाण्यात
कुस्करुन सरबत करून द्यावे.डांग्या खोकल्यावर
उंबराचा चिक टाळूवर लावावा.ताबडतोब थांबतो.
किडनि स्टोन ( मूत्रखडा)याकरता उपाय उंबराच्या
झाडाच्या खोडाला खाच द्यावी व तिथेच एक भांडे
अडकावे रात्रभर.रस झिरपून भांड्यात गोळा होईल.तो
सकाळी पिण्यास द्यावा.किडनी स्टोन तुटून बाहेर
पडतो.उंबर फळ दुधात शिजवून खाल्यास पचनसंस्था
मजबूत होते.पोटाचे सर्व विकार बंद होतात.विशेषतः हे
थंड गुणधर्माचे असल्यानेच आम्लपित्त,मळमळ,पोटात
दाह, अल्सर सारखे आजार याच्या सेवनाने बरे
होतात.तेव्हा आपल्या परिसरात याचे झाड असणे
आवश्यक आहे.अतिशय उपयोगि औषधी गुणधर्माचा हा
वृक्ष कायम चिरतरूण ठेवतो.
उस्मानाबाद दोन पाॅजिटीव
दि. 26 #उस्मानाबाद येथून 81 swab तपासणी साठी वि दे शा वै महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 2 पॉसिटीव्ह, 2 inconclusive व 77 नेगेटिव्ह असा आहे.
x
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती
दोन्ही पेशंट नाळीवाडगाव ता.भूम येथील असून ते पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत.
आजच्या रिपोर्ट मध्ये बाहेरगावी असलेले दोन पेशंट समाविष्ट करण्यात आले आहेत.
Total cases 198.
Discharge 152.
Death 09.
Active patients 37
Thursday, 25 June 2020
तळपायांची,हाताची सतत आग होणे-कारणे व उपाय
१)नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास
२)मधुमेहाची शक्यता असल्यास.
३)व्हिटमीनबी १२ ची कमी.
४)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.
५)लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.
६)थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास
७)रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.
८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
९)फोलिक अॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.
१०)बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.
११)मद्यपानाचे व्यसन
१२)किडनी संबंधित आजार.
१३)एखाद्या किटकाचा दंश.
*उपाययोजना.
१)गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते
२)कैलास जीवन लावून माँलीश केल्यास.
३)एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.
४)दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.
५)दोन चमचे अँपलव्हेनिगर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.
६)पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण
खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध असत .
७)कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव किलो साल काढुन,आवळा गर पाव किलो
आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.
८)शतधौत घ्रुत पायाला लावत जा.
९)धनेजीरे पाणी पीत जा.
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार रूग्ण पाॅजिटीव सापडले
तुळजापूर तालुक्यात चार कोरोना रुग्ण वाढले
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील चार जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे.सर्वच्या सर्व पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत.
आज २५ जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून ४६ स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी चार पॉजिटीव्ह व ३९ नेगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील दोन, हंगरगा येथील एक आणि वानेगाव येथील एक आहे. दरम्यान काल औंढा ता निलंगा. जि. लातूर येथील एक रुग्ण उमरगा येथे पॉजिटीव्ह आला होता तो आज लातूर जिल्ह्यात वर्ग झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण
कोरोना बाधित रुग्ण -१९४
बरे झालेले रुग्ण - १४४
मृत्यू - ९
ऍक्टिव्ह रुग्ण - ४१
Wednesday, 24 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. पैकी तीन रुग्ण भूम तालुक्यातील , एक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील तर एक रुग्ण उमरगा तालुक्यातील आहे.
आज २४ जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून ४६ स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी पाच पॉजिटीव्ह व ३९ नेगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह तीन रुग्ण भूम तालुक्यातील नाळी वडगाव एक , ईडा एक आणि भूम शहरातील लक्ष्मीनगर एक तसेच उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली एक आणि औंढा ता. निलंगा, लातूर येथील असून तो उमरगा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. सर्व रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण -191
बरे झालेले रुग्ण - 140
मृत्यू - 08
ऍक्टिव्ह रुग्ण - 43
मी,माझी शाळा आणि माझे शिक्षक
कोरोना संकट मुळे सगळे लोक आपल्या घरी आहेत. प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळत आहे..
आज असंच माझीशाळा एपिसोड युट्युब वर बघत असताना मला जाणवले, की आपली प्राथमिक शाळा त्यातील शिक्षक आणि या शाळेने मला काय दिलं. मी कसा घडलो त्यामध्ये शिक्षकांचा रोल किती महत्त्वाचा होता ह्याची जाणीव झाली..
आमच्यावेळी हाफ चड्डी पांढरा शर्ट आणि नायलॉन ची बॅग त्याच्यामध्ये वाहया पुस्तक..
ना त्यावेळी कसली ट्युशन असायची न पर्सनल गाईडन्स. जे काही घडलं ते शिक्षकांमुळे मला पहिली व दुसरीचे एवढे आठवत नाही पण तिसरी मध्ये असताना आम्हाला शिकवायला पाटील सर असायचे ते गावात राहायचे. ते खूप छान शिकवायचे , त्यांच्याविषयी एवढे आठवत नाही पण ते खूप छान शिकवायचे..यामध्येच आम्हाला भागवत तांबारे सर म्हणून शिकवायला आले. ते नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन लावायचे जो कोणी एक ते शंभर पर्यंत लिहून लवकर दाखवेल त्याला चॉकलेट, गणित लवकर सोडवेल त्याला चॉकलेट.. ते वर्गामध्ये चॉकलेटचा पुडा घेऊन यायचे. ते एक ते तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर ऊभे करून चॉकलेट द्यायचे त्यामुळे असं वाटायचं की आपण खूप काहीतरी जिंकले, आपण खूपच हुशार आहोत... आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन मुलं पुढे जायची त्याच्यामुळे सर्वांमध्ये कॉम्पिटिशन लागल्यासारखा वाटायचं आणि खूप मज्जा यायची अभ्यास करायला..
त्यानंतर चौथीमध्ये वायकर सर आमचे क्लास टीचर होते. वायकर सर जरा कडक होते चुकलं की फटके द्यायचे पण स्वभाव पण चांगला होता समजून पण खूप सांगायचे. त्यामुळे आमच्या वर्गाला एक वेगळेच वळण लागले होतो . शिस्तीच्या बाबतीत ते कडकच होते. चौथीमध्ये असताना मी जास्त हुशार बी नाही आणि ढ बी नाही असा मिडीयम विद्यार्थी होतो..
जेव्हा पाचवीमध्ये आलो तेव्हा नवीन एक सब्जेक्ट आला तो म्हणजे इंग्लिश त्याची भयंकर भीती आणि इंग्लिश विषय शिकवायला जगदाळे सर त्यांची तर जास्तच भीती , दहशत होती मनावर ते खूप मारायचे शब्द पाट नाही झाले की असे सहावीचे मुलं सांगायचे आम्हाला..
जगदाळे सरांनी आम्हाला पाचवी ते सातवी इंग्लिश शिकवलं खूप मारायचे पण जे काही इंग्लिश मला जमायचं किंवा जमतंय ते त्यांच्यामुळेच. ते आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने इंग्लिश शिकवायचे क्लासमध्ये रेडिओ घेऊन यायचे टेप घेऊन यायचे इंग्लिश कविता ते टेपवर लावून आमच्याकडून पाठ करून घ्यायचे.. त्यांच्याकडून इंग्लिश कविता शिकायला मजा यायची खेळीमेळीचे वातावरण असायचं.. ते आम्हाला दररोज शब्द पाठ करायला द्यायचे मला आठवतंय मी सकाळी लवकर उठून चिमणीच्या प्रकाशात सकाळ-सकाळ मोठ्यामोठ्याने शब्द पाठ करायचो.. कारण शब्द नाही आले कि मार हा असायचाच.. त्यांना शब्द पाठ न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खुपच राग यायचा कारण ते तेवढेच जीव तोडून शिकवायचे आम्हाला.. मी आठवड्यातून एक दोन वेळा नक्कीच मार खायचो..
कन्हेरवाडी चे कवडे सर असायचे त्यांची मुलं खूप चेष्टा करायची.. ते आई वडिलांचे महत्व समजावून सांगायचे. आईला आपण आव जाव का बोलत नाहीत असं विचारायची.
त्यानंतर गावातील तांबारे मॅडम त्या गणित शिकवायचे त्या पण खूप छान शिकवायच्या..
वाघमारे सर खरंच खूप भारी व्यक्तिमत्व हे आमचे खेळांचे शिक्षक. त्यांच्यामुळेच आम्हाला कबड्डी, खो-खो खेळणे , 26जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट त्यावेळेस लेझीम, घुंगरू काठी , डान्स, कोळी गीत, याचा जीव ओतून सराव करून घ्यायचे त्यात खूप मज्जा पण यायची..
शिकवण्याच्या बाबतीत पण खूप छान होते. सर या सर्वांचा प्रॅक्टिस शाळा संपल्यावर पण करून घ्यायचे..वर्ग प्रमाणे झाडे लावणे झाडासाठी काटड्या तोडून आणणे प्रत्येक वर्गाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या ग्रुपने ते झाडे सांभाळणे त्याच्यावर लक्ष असायचे..
पाचवी ला नवोदय व सातवीला कॉलरशिप ची एक्झाम असायची. यासाठी वेगळे क्लास असायचे मला आठवतय आम्हाला श्रीकांत तांबरे सर बुद्धिमत्ता चाचणी व गणित शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत व विद्यार्थ्यांशी समजावून सांगण्याची पद्धत खरोखरच खूप वेगळी आहे. त्याच्यामुळेच कि काय मला बुद्धिमत्ता चाचणी व गणित खूपच आवडू लागले होते.. ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत जागृत होते विशेष म्हणजे शाळा सुटल्यानंतर सुद्धा ते क्लास घ्यायचे व त्या क्लासला आम्ही आवर्जून बसायचो..त्यांचा
क्लास कधी बोर व्हायचाच नाही.
कॉलरशिप ला का नवोदय ला व्यवस्थित आठवत नाही पण कावळे सर पण गणित शिकवायचे. शाळा सुटल्यावर पण ते आम्हा काही विद्यार्थ्यांना घरी पण शिकवायचे. ते चांगले शिकवायचे, पण मला कधी त्यांच्याकडून गणित समजलंच नाही. माहित नाही पण त्यांच्या विषयी असलेली भीती होती का
काय? एकदा लेझीम खेळण्यासाठी धोतर घालत होतो, त्यामुळे मी उड्या मारत होतो की काय माहित नाही पण कावळे सरांनी त्या वेळेस खूप मारलं होतं. एवढे का मारले कळलच नाही?? त्यांनी माझ्यावर कुठला राग काढला हे ही कळलं नाही? त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक भीती बसली ती कायमचीच.
मला आठवतय श्रीकांत तांबारे सर आम्हाला सातवी ला विज्ञान शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत खरंच खूप वेगळी होती एका टेस्टमध्ये वर्गांमध्ये मी कधी नाही तो विज्ञान मध्ये प्रथम आलो होतो.. मी तसा अवरेज विद्यार्थी, मला मार्क्स कमी ही नाही आणि जास्तही नाही मध्येच असायचे.
पण विज्ञान मध्ये मी प्रथमच यायचो. हे असे कसे काय घडले कारण श्रीकांत सरांचे सर्व विद्यार्थ्यांना विषय असलेली अस्ता व शिकवण्याची पद्धत. ते कधीच कोणत्या विद्यार्थ्याला कमी लेखायचे नाहीत.. मला आठवतंय ते सहसा पुस्तक नसतानाच शिकवायचे व पुस्तका व्यतिरिक्त बरच काही सांगायचे.. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाची असलेली आवड निर्माण होत असे. पुस्तका व्यतिरिक्त म्हणजे काय माणसाच्या शरीरात रक्त किती लिटर असतं. एका मिनिटात हार्टबीट किती असतात. माणसाच्या शरीरात हाडे किती असतात .कुठल्या शरीरावर केस नसतात. असे अनेक प्रश्न विचारून ते आम्हाला कुतूहल निर्माण करायचे. मला आठवतंय त्यांनी आम्हाला कधी कडक शिक्षा केली असं कधीच घडलं नाही.. ते आम्हाला चुका समजावून सांगायचे.. त्यामुळेच कि काय ते आमच्या वर्गाचे आवडते शिक्षक होते.जेव्हा मी विज्ञान मध्ये प्रथम यायचं तेव्हा मला कळले मी पण हुशार विद्यार्थी आहे..
हे केव्हा घडतं एखादा अवरेज विद्यार्थी चांगले मार्च केव्हा घेतो.
जेव्हा त्याला त्या विषयांमध्ये अभ्यास करण्याची आवड निर्माण होते व हे केव्हा होते एखादा शिक्षक त्याविषयी कुतूहल निर्माण करून शिकवतात..
खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचे महत्त्व खूप आहे आपण जे आहोत ते शिक्षकां मुळेच..
बुद्धी की सर्वांना सारखे असते पण त्या बुद्धीचा कशा पद्धतीने वापर करावा हे शिक्षकच शिकू शकतात. आणि ही कला काहीच शिक्षकाकडे असते..
पण मला माझ्या शाळेमध्ये मिळालेली सर्वाच शिक्षक ही आदर्श शिक्षक होती व आहेत..
अशा माझ्या सर्व गुरुजन वर्ग यांना मानाचा मुजरा ज्यामुळे मी आज घडलो आहे..👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ते म्हणतात ना गुरु म्हणजे
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः*
मुकुंद काळे..
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदोरा, तालुका -कळंब जिल्हा -उस्मानाबाद*
Tuesday, 23 June 2020
आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
पुलवामात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या सोलापूरच्या सुनील काळे यांचं पार्थिव मूळगावी दाखल, आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, गावावर शोककळा
https://t.co/lLBUpXgKaX
Subscribe to:
Comments (Atom)











